शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बाजारात नैसर्गिक रंग ३५० प्रती किलाे; मागणी नसल्याने रासायनिक रंग ८० रुपये किलोवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 16:37 IST

रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. त्यामुळे याला पर्याय म्हणून आता नैसर्गिक रंग वापरला जात आहे.

नारायण गावस -

पणजी: शिमगोत्सवात रंगाला मोठी मागणी असल्याने बाजारात माेठ्या प्रमाणात रंग विक्रीस आले आहे. पण वाढत्या आराेग्याच्या काळजीमुळे आता लोक रासायनिक रंगापेक्षा हर्बल म्हणजे नैसर्गिक रंगाचा वापर जास्त करत आहेत. याचा परिणाम म्हणून रासायनिक रंगाचा दर खाली आला असून नैसर्गिक रंगाच्या किमती वाढल्या आहे. बाजारात नैसर्गिक रंग ३५० रुपये किलाेने विकला जात आहे. तर रसायनिक रंग ८० ते १०० रुपये प्रती किलाेने विकला जात आहे. 

रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. त्यामुळे याला पर्याय म्हणून आता नैसर्गिक रंग वापरला जात आहे. फळांपासून, फुलांपासून तसेच बियांपासून व  झाडांच्या खोडापासून हा रंग तयार केला जाताे. हा रंग अंगावर चिकटून राहत नाही तसेच डोळ्यात ताेंडात गेल्यावर त्याचा परिणाम जाणवत नाही. म्हणून आता अनेक कंपन्यांनी नैसर्गिक रंगाची निर्मिती केली आहे. अनेक कंपन्यांनी आपला हर्बल रंग मार्केटमध्ये आणला आहे. त्यामुळे  या रासायनिक रंगाची मागणी घटली आहे. म्हणून दरही खाली आले आहेत.

राज्यातील जैवविविध मंडळातर्फे हा नैसर्गिक रंग तयार केला जातो. तसेच विविध महिला मंडळांना  रंग तयार करण्याचे प्रशिक्षण जैवविविधता मंडळाने दिले आहे. पुढील काही वर्षापासून पूर्णपणे हा नैसर्गिक रंगाचा वापर केला जाणार आहे त्यामुळे आता या रासायनिक रंगाची मागणी खूपच कमी होणार आहे.

बाजारात रंगाप्रमाणे शिमगाेत्सवाला लागणारे मुखवटे तसेच पिचकारी खरेदीसाठी उपलब्ध आहेत. विविध मुखवटे ५० ते १०० अशा विविध दरात विकली जात आहेत. तसेच पिचकारीही ४० ते २०० रुपये पासून विकली जात आहेत. शिमगोत्सवाने बाजारपेठ्या फुलल्या असून लाेक माेठ्याप्रमाणात खरेदी करत आहे.

टॅग्स :colourरंग