शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेतले तरच योग्य भवितव्य : मगोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:46 PM

गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

ठळक मुद्देभाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया दिपक ढवळीकर यांनी व्यक्त केली.गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक आहेत. गोवा विधानसभा सध्या 38 सदस्यीय असून या दोन्ही पक्षांकडे एकूण सहा आमदार आहेत.

पणजी - देशातील पाचपैकी दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, ते पाहता भाजपाने सत्तेतील घटक पक्षांना विश्वासात घेणे गरजेचे आहे हे स्पष्ट होते. गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.

गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक आहेत. गोवा विधानसभा सध्या 38 सदस्यीय असून या दोन्ही पक्षांकडे एकूण सहा आमदार आहेत. भाजपाकडे चौदा व काँग्रेसकडेही चौदा आमदार आहेत. तिघे अपक्ष आहेत व त्या तीन अपक्षांपैकी दोन जण सध्या सरकारवर खूप नाराज आहेत. ते प्रशासन ठप्प झाल्याची टीकाही जाहीरपणे करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे तूर्त काँग्रेसच्याबाजूने आहेत. गोव्यातील मगो पक्षाने यापूर्वी भाजपावरील दबाव वाढवला होता. मुख्यमंत्री आजारी असल्याने व ते घराबाहेर पडू शकत नसल्याने मुख्यमंत्रीपदाचा ताबा मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपविला जावा, अशी मागणी मगो पक्षाने यापूर्वी सातत्याने केली होती. खनिज खाणी जर 15 डिसेंबपर्यंत सुरू झाल्या नाही तर मगोपला वेगळा विचार करावा लागेल असाही इशारा मगोपने दिला होता.

दोन-तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला जी स्थिती आली, त्याविषयी लोकमतने प्रतिक्रिया विचारताच अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले, की गोव्यातही घटक पक्षांना भाजपाने विश्वासात घेतले नाही तर ते मुळीच योग्य होणार नाही असा संदेश देशभरातील वातावरणामधून मिळत आहे. भाजपाने मनमानी कारभार बंद करावा. सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घ्यावे, तरच चांगले भवितव्य आहे हे आता अधिक स्पष्ट झाले आहे. मी जे काही बोलत होतो ते योग्य होते हेही आता कळून येत आहे. लोकांना गृहित धरता येत नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरPoliticsराजकारण