शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

राजभाषा खात्याचा कारभार १ जुलैपासून पूर्णत: कोकणीत

By admin | Updated: June 15, 2014 01:18 IST

१ जुलैपासून कोकणी भाषेतून होणार असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

१ जुलैपासून कोकणी भाषेतून होणार असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राजभाषा संचालनालयातून इतर सरकारी, निमसरकारी कार्यालयांत जाणारी कागदपत्रे कोकणी भाषेतून पाठविण्यात येतील. कोकणी भाषेत होणाऱ्या या कारभाराचे रूपांतर मराठी भाषेत केले जाईल. राजभाषा संचालनालयाकडून फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित करण्यात आलेला पूर्ण परिभाषा कोश सर्व खात्यांत पाठविण्यात आला आहे. खात्याच्या प्रमुखांना राजभाषा अंमलबजावणी अधिकारी म्हणूनही प्रशिक्षण देण्यात आले आहे. परिभाषा कोशाचे सहकार्य घेऊन इतर खात्यांकडून येणारी पत्रेही कोकणी भाषेतून पाठविण्यात यावीत, अशी सूचना खातेप्रमुखांना देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कोकणीतून लिहिताना शब्दांच्या चुका होऊ नयेत, यासाठी परिभाषा कोशाची मदत घेण्याचा सल्लाही राजभाषा संचालनालयाकडून देण्यात आला आहे. राजभाषा संचालनालयाने यापूर्वी पाच तालुक्यांतील अधिकाऱ्यांना राजभाषा प्रशिक्षण दिले होते. जून महिन्यापासून सर्व तालुक्यांतील अधिकाऱ्यांना १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. राजभाषा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो अधिकारी हे प्रशिक्षण पूर्ण करेल, त्याला तीन हजार रुपये मानधन देण्यात येईल, असे राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वझरीकर यांनी सांगितले. लवकरच राज्यातील सर्व सरकारी खात्यांची संकेतस्थळे कोकणी, मराठी भाषेतून उपलब्ध होतील. यासाठीही प्रत्येक खात्यात, कार्यालयात, पंचायतीत कोकणी भाषेचे जाणकार असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची आवश्यकता भासेल. संकेतस्थळांसाठीचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरच तो सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे, असेही वझरीकर यांनी सांगितले. इतर भाषांवर अन्याय नको : खलप माजी केंद्रीय मंत्री व मराठी चळवळीचे नेते रमाकांत खलप म्हणाले, सर्व कागदोपत्री व्यवहार केवळ कोकणी भाषेतून करणे चुकीचे व नियमबाह्य होईल. कुठल्याही खात्यात पाठविण्यात येणाऱ्या सूचना, पत्रे कोकणी व मराठी या दोन्ही भाषांत पाठविणे सक्तीचे आहे. एकाच भाषेला जास्त प्रोत्साहन दिल्यास इतर भाषांवर अन्याय होईल. याबाबत शासकीय कारवाईही होऊ शकते. सरकारने कोकणी भाषा धोरणाचा स्वीकार केल्यास येणाऱ्या काळात सुमारे २५0 नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच कोकणी भाषेचे शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतील, तर नवी पिढी कोकणी भाषा शिकण्यात रस दाखवील. ...तर तक्रारीस वाव : वजरीकर कोणत्याही सरकारी खात्यात, कार्यालयात, पंचायत किंवा इतर ठिकाणी नागरिकांना कोकणी, मराठी या भाषांतून अर्ज करता येतात. ज्या भाषेत नागरिक अर्ज करतात किंवा तक्रार सादर करतात, त्याच भाषेतून त्यांना उत्तर मिळणे आवश्यक आहे. अन्यथा, नागरिकांना अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याचा हक्क आहे. कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास ती कोकणी किंवा मराठी भाषेत घेता येते. अधिकाऱ्यांकडून स्थानिक कोकणी, मराठी किंवा हिंदी भाषेतून माहिती जाणून घेण्याचा हक्क नागरिकांना आहे, असेही वजरीकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)