शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

देशाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर, अधिक बचत करणे आवश्यक - निखिल गुप्ता

By समीर नाईक | Published: February 23, 2024 2:25 PM

सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

पणजी : भारताला आपली अर्थव्यवस्था ८ टक्के दराने वाढवायची असेल तर पुढील दोन दशकांमध्ये अधिक बचत करणे आवश्यक आहे.अर्थव्यवस्थेत घरगुती (घरे आणि छोटे व्यवसाय), कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार आणि विदेशी व्यापार हे चार प्रमुख घटक असल्याचे सांगितले. हे घटक कोणतीही अर्थव्यवस्था बनवतात किंवा बिघडतात, असे मत अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी व्यक्त केले.

पणजीत शुक्रवारी सकाळी इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे त्यांच्या “द एट पर्सेंट सोल्युशन” या पुस्तकावर आयोजित व्याख्यानात गुप्ता बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशाला बचत करायची असेल आणि वाढीचा दर स्थिर ठेवायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारांनी त्यांचे कर्ज कमी करणे आवश्यक आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने घरगुती क्षेत्रात बचतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. खाजगी क्षेत्राला पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

सरकारने स्वतःचे कर्ज कमी करण्यासाठी संरक्षण, रेल्वे आणि रस्ते बांधणी यासारख्या क्षेत्रांचे खाजगीकरण केले पाहिजे. बचत हा गुंतवणुकीसाठी प्राथमिक स्त्रोत आहे. गुंतवणूक कोणत्याही देशात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीस मदत करते. केवळ साधा उपभोग अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करू शकत नाही, असे गुप्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले. 

अमेरिकेत आर्थिक संकट येण्याची शक्यता 

कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी अमेरिका हा चांगला आदर्श नाही. आज ते मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कर्ज माफ करत आहेत. याचे परीणाम लवकरच दिसू लागतील आणि ४ ते ५ वर्षांत यूएसएला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेच्या कर्जाभिमुख अर्थव्यवस्थेवर बोलताना गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाEconomyअर्थव्यवस्था