शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

कर्नाटकमधून वीज घेणे सरकारने थांबविले, दक्षिण गोव्याला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 7:57 PM

कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते.

पणजी : कर्नाटकमधून म्हणजेच दक्षिण ग्रीडच्या माध्यमातून गोव्याला एवढी वर्षे जी वीज यायची, ती वीज स्वीकारणे गोवा सरकारने सोमवारपासून थांबविले आहे. आता पश्चिम ग्रीडमधून म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेहून दक्षिण गोव्याला वीज पुरवठा होईल. दक्षिण गोव्यातील लोकांना भेडसावणारी वीज समस्या यामुळे सुटेल, असा विश्वास वीजमंत्री निलेश काब्राल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते. पावसाळ्य़ात झाडे पडतात तसेच उंच बांबूही त्या वीज वाहिन्यांना येऊन टेकतात आणि वारंवार वीजेची समस्या निर्माण होते. ती समस्या आम्ही त्वरित दूर करू शकत नाही, कारण अनेकदा कर्नाटकमध्ये वीज वाहिनीला समस्या आलेली असते. कर्नाटकच्याच यंत्रणेने ती समस्या दूर करावी लागते. पण त्यासाठीही कर्नाटकच्या यंत्रणेला जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच ती यंत्रणा ते काम करू शकते. आम्ही त्यांना आदेश देऊ शकत नाही, असे मंत्री काब्राल म्हणाले. 

देशभर एकच राष्ट्रीय ग्रीड आहे. तिथूनच पूर्ण देशाला वीजेचा पुरवठा होतो. आम्ही सगळे सोपस्कार पार पाडले व कर्नाटमधून येणारी वीज थांबवली आहे. पश्चिम ग्रीडमधून उत्तर गोव्याला वीज येते. हीच वीज दक्षिण गोव्यालाही येईल. धारबांदोडय़ाला पुढील तीन-चार वर्षात 40 केव्ही क्षमतेचे नवे मोठे वीजउपकेंद्र उभे केले जाईल. तिथे एक लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन घेतलेली आहे. एकदा ते केंद्र उभे राहिल्यानंतर मग कर्नाटकमधील वीज पुरवठा आम्ही पुन्हा स्वीकारू, असेही काब्राल यांनी जाहीर केले.

लोकांनी त्याग करावा गोव्याला 1 हजार मेगावॅट वीज मिळते. आम्ही फक्त 650 मेगावॅट एवढीच वीज वापरू शकतो. कारण वीज वितरणाचे जाळे आमच्याकडे नाही. ते जाळे उभे करण्यासाठी आवश्यक सुधारणा आम्ही करणार आहोत. आमच्याकडे वीज कमी नाही. चोवीस तास पूर्ण गोव्याला वीज देता येते. मात्र सुधारणा व्हायच्या असेल व लोकांना अखंडीतपणे वीज हवी असेल तर लोकांना थोडा त्याग करावा लागेल, असा सल्ला काब्राल यांनी दिला. हा त्याग कोणता तेही त्यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी लोकांनी थोडी तरी जमीन उपलब्ध करून द्यायला हवी. वीज वाहिन्या एखाद्या ठिकाणहून जात असतील तर तिथे विरोध करू नये. पर्रा भागात अलिकडेच खूप विरोध झाला, असे काब्राल म्हणाले. महाराष्ट्र व कर्नाटकच्या तुलनेत गोव्यात वीजेचे दर कमी आहेत. आमच्याकडे पुष्कळ ट्रान्सफॉर्मर्स उपलब्ध आहेत. एखाद्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मोडला तर, आम्ही नवेच ट्रान्सफॉर्मर्स बसवतो. लोकांना व दक्षिणेच्या एका सरपंचालाही तांत्रिक गोष्टी कळतच नाहीत. वीज नाही म्हणजे नेमके काय झाले हे न कळताच लोक बोलतात असेही काब्राल म्हणाले.

टॅग्स :electricityवीज