शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आव्हाने-प्रतिआव्हानांनी तापले राजकारण; एकमेकांच्या कामगिरीस दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 08:27 IST

खलप, विरियातो, श्रीपाद यांचे विविध दावे

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी:काँग्रेसने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केल्याने आव्हाने - प्रतिआव्हाने, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने 'इलेक्शन फिव्हर' निर्माण झाला आहे. निवडणूक होईपर्यंत ही रणधुमाळी चालूच राहणार आहे.

केंद्रात मंत्री व खासदार म्हणून श्रीपाद नाईक यांनी गेल्या २५ वर्षांत काय केले ते खुल्या व्यासपीठावर येऊन सांगावे. नपेक्षा अठरा महिने केंद्रात मंत्री असताना मी काय केले ते सांगतो, असे थेट आव्हान काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना खलप म्हणाले, २५ वर्षात श्रीपाद यांनी गोव्यासाठी काय केले ते लोकांना कळायला हवे. खलप यांनी काल एका चॅनेलशी बोलताना भाऊंच्या विधानाचा समाचार घेतला. खलप म्हणाले की गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवले तरी श्रीपाद यांनी चकार शब्दही काढला नाही. केंद्रात मी खासदारा बनलो आणि काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर मी म्हादईचे पाणी वळविण्यास प्राणपणाने विरोध करीन.

काय म्हणाले होते श्रीपादभाऊ नाईक?

श्रीपादभाऊंनी रविवारी खलप यांनाही टोला हाणताना १९९९च्या लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात मंत्री असतानाही खलप यांना मला पराभूत करणे जमले नाही ते आता काय जमणार? असा खोचक सवाल करून टोला हाणला होता. काँग्रेस फक्त विजयाची स्वप्ने पाहात आहे, अशी टीका श्रीपाद यांनी केली होती.

'आरजी'ने उमेदवार मागे घ्यावेत : विरियातो

काँग्रेसचे दक्षिणचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी आरजीने आपले उमेदवार मागे घ्यावेत, असे आवाहन केले आहे. सर्वांनाच ठाऊक आहे की आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत. त्यामुळे मते वाया घालवू नका. अजूनही उशीर झालेला नाही. गोव्याच्या हितासाठी उमेदवार मागे घ्या. आरजीने उमेदवार मागे घेतले तर या धाडसी निर्णयाबद्दल सर्वांच्या ते कायम स्मरणात राहतील.

कळंगुटची वाट का लागली? : खलप

श्रीपादभाऊंना प्रश्न करताना खलप म्हणाले की, कळंगुटची वाट का लागली? राज्यात येणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावर बाथरुम, चेंजिंग रुम शोधाव्या लागतात. एवढी वर्षे पर्यटन राज्यमंत्री म्हणून काम करताना तुम्ही काय केले? कळंगुटला काय चालते, हे तुम्ही पाहिले आहे का? उगाच माझ्याविषयी खोटी माहिती पसरवू नका, असा सल्ला काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिला आहे.

आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत : मनोज परब

आरजीचे उमेदवार मनोज परब म्हणाले, कुठल्या गोवकराने आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत, असे सांगितले? उलट विरियातो हे काँग्रेसने आयात केलेले उमेदवार आहेत. स्वतःची संघटना वाऱ्यावर सोडून ते काँग्रेसमध्ये आले. त्यांनी आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत. दाबोळी मतदारसंघातील लोक वगळता त्यांना दक्षिणेत कुठल्याही मतदारसंघात लोक ओळखत नाहीत, असा टोला लगावला.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस