शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आव्हाने-प्रतिआव्हानांनी तापले राजकारण; एकमेकांच्या कामगिरीस दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 08:27 IST

खलप, विरियातो, श्रीपाद यांचे विविध दावे

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी:काँग्रेसने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केल्याने आव्हाने - प्रतिआव्हाने, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने 'इलेक्शन फिव्हर' निर्माण झाला आहे. निवडणूक होईपर्यंत ही रणधुमाळी चालूच राहणार आहे.

केंद्रात मंत्री व खासदार म्हणून श्रीपाद नाईक यांनी गेल्या २५ वर्षांत काय केले ते खुल्या व्यासपीठावर येऊन सांगावे. नपेक्षा अठरा महिने केंद्रात मंत्री असताना मी काय केले ते सांगतो, असे थेट आव्हान काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना खलप म्हणाले, २५ वर्षात श्रीपाद यांनी गोव्यासाठी काय केले ते लोकांना कळायला हवे. खलप यांनी काल एका चॅनेलशी बोलताना भाऊंच्या विधानाचा समाचार घेतला. खलप म्हणाले की गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवले तरी श्रीपाद यांनी चकार शब्दही काढला नाही. केंद्रात मी खासदारा बनलो आणि काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर मी म्हादईचे पाणी वळविण्यास प्राणपणाने विरोध करीन.

काय म्हणाले होते श्रीपादभाऊ नाईक?

श्रीपादभाऊंनी रविवारी खलप यांनाही टोला हाणताना १९९९च्या लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात मंत्री असतानाही खलप यांना मला पराभूत करणे जमले नाही ते आता काय जमणार? असा खोचक सवाल करून टोला हाणला होता. काँग्रेस फक्त विजयाची स्वप्ने पाहात आहे, अशी टीका श्रीपाद यांनी केली होती.

'आरजी'ने उमेदवार मागे घ्यावेत : विरियातो

काँग्रेसचे दक्षिणचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी आरजीने आपले उमेदवार मागे घ्यावेत, असे आवाहन केले आहे. सर्वांनाच ठाऊक आहे की आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत. त्यामुळे मते वाया घालवू नका. अजूनही उशीर झालेला नाही. गोव्याच्या हितासाठी उमेदवार मागे घ्या. आरजीने उमेदवार मागे घेतले तर या धाडसी निर्णयाबद्दल सर्वांच्या ते कायम स्मरणात राहतील.

कळंगुटची वाट का लागली? : खलप

श्रीपादभाऊंना प्रश्न करताना खलप म्हणाले की, कळंगुटची वाट का लागली? राज्यात येणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावर बाथरुम, चेंजिंग रुम शोधाव्या लागतात. एवढी वर्षे पर्यटन राज्यमंत्री म्हणून काम करताना तुम्ही काय केले? कळंगुटला काय चालते, हे तुम्ही पाहिले आहे का? उगाच माझ्याविषयी खोटी माहिती पसरवू नका, असा सल्ला काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिला आहे.

आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत : मनोज परब

आरजीचे उमेदवार मनोज परब म्हणाले, कुठल्या गोवकराने आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत, असे सांगितले? उलट विरियातो हे काँग्रेसने आयात केलेले उमेदवार आहेत. स्वतःची संघटना वाऱ्यावर सोडून ते काँग्रेसमध्ये आले. त्यांनी आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत. दाबोळी मतदारसंघातील लोक वगळता त्यांना दक्षिणेत कुठल्याही मतदारसंघात लोक ओळखत नाहीत, असा टोला लगावला.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस