शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आव्हाने-प्रतिआव्हानांनी तापले राजकारण; एकमेकांच्या कामगिरीस दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2024 08:27 IST

खलप, विरियातो, श्रीपाद यांचे विविध दावे

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी:काँग्रेसने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केल्याने आव्हाने - प्रतिआव्हाने, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने 'इलेक्शन फिव्हर' निर्माण झाला आहे. निवडणूक होईपर्यंत ही रणधुमाळी चालूच राहणार आहे.

केंद्रात मंत्री व खासदार म्हणून श्रीपाद नाईक यांनी गेल्या २५ वर्षांत काय केले ते खुल्या व्यासपीठावर येऊन सांगावे. नपेक्षा अठरा महिने केंद्रात मंत्री असताना मी काय केले ते सांगतो, असे थेट आव्हान काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना खलप म्हणाले, २५ वर्षात श्रीपाद यांनी गोव्यासाठी काय केले ते लोकांना कळायला हवे. खलप यांनी काल एका चॅनेलशी बोलताना भाऊंच्या विधानाचा समाचार घेतला. खलप म्हणाले की गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवले तरी श्रीपाद यांनी चकार शब्दही काढला नाही. केंद्रात मी खासदारा बनलो आणि काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर मी म्हादईचे पाणी वळविण्यास प्राणपणाने विरोध करीन.

काय म्हणाले होते श्रीपादभाऊ नाईक?

श्रीपादभाऊंनी रविवारी खलप यांनाही टोला हाणताना १९९९च्या लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात मंत्री असतानाही खलप यांना मला पराभूत करणे जमले नाही ते आता काय जमणार? असा खोचक सवाल करून टोला हाणला होता. काँग्रेस फक्त विजयाची स्वप्ने पाहात आहे, अशी टीका श्रीपाद यांनी केली होती.

'आरजी'ने उमेदवार मागे घ्यावेत : विरियातो

काँग्रेसचे दक्षिणचे उमेदवार विरियातो फर्नाडिस यांनी आरजीने आपले उमेदवार मागे घ्यावेत, असे आवाहन केले आहे. सर्वांनाच ठाऊक आहे की आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत. त्यामुळे मते वाया घालवू नका. अजूनही उशीर झालेला नाही. गोव्याच्या हितासाठी उमेदवार मागे घ्या. आरजीने उमेदवार मागे घेतले तर या धाडसी निर्णयाबद्दल सर्वांच्या ते कायम स्मरणात राहतील.

कळंगुटची वाट का लागली? : खलप

श्रीपादभाऊंना प्रश्न करताना खलप म्हणाले की, कळंगुटची वाट का लागली? राज्यात येणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावर बाथरुम, चेंजिंग रुम शोधाव्या लागतात. एवढी वर्षे पर्यटन राज्यमंत्री म्हणून काम करताना तुम्ही काय केले? कळंगुटला काय चालते, हे तुम्ही पाहिले आहे का? उगाच माझ्याविषयी खोटी माहिती पसरवू नका, असा सल्ला काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी दिला आहे.

आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत : मनोज परब

आरजीचे उमेदवार मनोज परब म्हणाले, कुठल्या गोवकराने आरजीचे उमेदवार जिंकणार नाहीत, असे सांगितले? उलट विरियातो हे काँग्रेसने आयात केलेले उमेदवार आहेत. स्वतःची संघटना वाऱ्यावर सोडून ते काँग्रेसमध्ये आले. त्यांनी आम्हाला ज्ञानाचे डोस पाजू नयेत. दाबोळी मतदारसंघातील लोक वगळता त्यांना दक्षिणेत कुठल्याही मतदारसंघात लोक ओळखत नाहीत, असा टोला लगावला.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस