शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

बाबांच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात: उत्पल पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 07:21 IST

Lokmat Exclusive: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज पुण्यतिथी.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री म्हणून गोव्याच्या विकासात आणि संरक्षणमंत्री म्हणून देशाच्या सैन्यदलासाठीचे त्यांचे योगदान कायम संस्मरणीय आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

आज बाबा देवाघरी जाऊन तब्बल सहा वर्षे झाली. माझ्यासाठी, माझ्या वडिलांची आठवण ही एका क्षणापुरती नाही, तर त्यांच्या हास्यापासून, त्यांनी शिकवलेल्या धड्यांपासून आणि त्यांच्या उपस्थितीत लपलेल्या अव्यक्त प्रेमापासून विणलेली एक टेपेस्ट्री आहे. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. इतकी खोल की, ती वर्णनाला आव्हान देते आणि तरीही इतकी सूक्ष्म की, ती दैनंदिन जीवनाच्या भेगांमध्ये सहज शिरते.

सुरुवातीला वाटलं होतं की, दिवस आणि वर्षे निघून गेल्यावर ही पोकळी हळूहळू कमी होईल. पण, आता हे अशक्य आहे, याची जाणीव झाली आहे. मी व्यक्त करत असलेल्या या भावना केवळ माझ्यापुरत्या मर्यादित नाहीत; ज्यांनी आपले वडील गमावले आहेत, त्यांनाही असंच वाटत असेल. तरीही, माझ्या वडिलांनी मागे ठेवलेला वारसा या भावनांना अधिक तीव्र करतो. आज गोव्यात दैनंदिन कामासाठी कुठेही गेलं, तरी त्यांनी सोडलेली छाप दिसते आणि ती या भावनांना आगीत तूप घातल्याप्रमाणे उफाळून आणते.

उदाहरणार्थ, मी जेव्हा अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोजवळ राहत होतो, तेव्हा बाबा आले की, आम्ही 'गोल्डन गेट ब्रिज' पाहायला तीर्थयात्रेसारखं जायचो. आमच्या घरी त्या पुलासमोर काढलेले अनेक फोटो आहेत. एका जवळच्या व्यक्तीने मला विचारलं होतं, 'अमेरिकेत बघायला दुसरं काही नाही का?' पण आता जेव्हा मी गोव्यात अटल सेतू किंवा नव्या जुवारी पुलावरून माझ्या कारखान्यात जातो, तेव्हा या आठवणींचा ओलावा डोळ्यांत जाणवतो.

गेल्या महिन्यात मी पुण्याला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेलो. बाबांच्या सहवासातील अनेकजण तिथे उतरतात आणि पहिला फोन करून विचारतात, 'हे अर्धवट नाव कशासाठी?', मी त्यांना काय सांगणार? हो-नाहीत उत्तर द्यायचं. पण, २००१ साली, जेव्हा मी अमेरिकेत शिकायला गेलो होतो, तेव्हा बाबा मला भेटायला डेट्रॉइटजवळ माझ्या विद्यापीठात आले होते. मी नवीनच असल्याने माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. मग आयएएस विजय मदन यांनी गाडी भाड्याने घेऊन आम्ही मॉन्ट्रियलला गेलो, जिथे आयसीएओ (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन) आहे. या आठवणी परत येणार नाहीत का? पण या मोठ्या गोष्टींपेक्षा सुखद आठवणी लोकांच्या सहज संपर्कातून येतात. एका हितचिंतकाने माझ्यासाठी देवळात प्रार्थना केली आणि मला म्हणाला, 'आमोण्याला सोबत ये.' एका रविवारी मी त्याच्यासोबत त्या देवळात गेलो.

दर्शनानंतर जवळच्या चहाच्या दुकानात चहा आणि मिरच्या खात बसलो, तेव्हा दुकानाचा मालक मला पाहून बाहेर आला आणि म्हणाला, 'आमोण्याला आल्यावर भाई इथेच बसून चहा घेत,' आणि चक्क पैसे घेण्यास नकार दिला. त्याच्या या प्रेमापुढे मी तरी किती आग्रह धरणार?

काणकोणला एकदा कार्यक्रमानिमित्त गेलो, तेव्हा एका भाजपच्या कार्यकर्त्याकडे चहाला थांबलो. खुर्चीत बसलो, तर तो म्हणाला, 'भाई माझ्या घरी येत असत आणि इथेच बसत,' असं म्हणून त्याने डोळ्यात अश्रू आणले. अशा छोट्या-छोट्या गोष्टी लोकांमध्ये मिसळताना घडतात, तेव्हा ही पोकळी विसरण्यासाठी मनाला जणू लेप लावल्यासारखं वाटतं.

हा लेख मी मुद्दाम वैयक्तिक विषयावर लिहिला आहे. आज गोवा राजकीयदृष्ट्या कुठल्या दिशेने जातोय किंवा बाबा असते तर काय घडलं असतं, हे भाकीत मला करायचं नाही. त्यावर 'judge आणि jury' ही जनताच असलेली बरी. तरीही, सोशल मीडियावर अनेकदा 'आज भाई आसुंक जाय आशिल्लो' असं वाचलं की, लोकांच्या मनात त्यांच्या आठवणी अजूनही ठाम आहेत, याची खात्री पटते.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरUtpal Parrikarउत्पल पर्रिकरPoliticsराजकारण