शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

विधानसभा विसर्जन नको; सत्तास्थापनेसाठी संधी द्या, काँग्रेसकडून राष्ट्रपतींना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 7:23 PM

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे.

पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असून काँग्रेसने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपल्याला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, असे साकडे घातले आहे. काँग्रेसला संधी दिल्याशिवाय विधानसभा विसर्जित करु नये, अशी विनंती पक्षाने केली आहे. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना याबाबतीत आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.विधानसभा विसर्जित केली जाऊ शकते, अशी भीती काँग्रेसला आहे. काँग्रेसकडे बहुमत असल्याचा पक्षाचा दावा असून सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची या पत्रावर सही असून ते म्हणतात की, ह्यराज्यात प्रशासन पूर्णपणे कोलमडलेले आहे आणि त्यामुळे जनता मात्र भरडली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लोकांच्या मूलभूत समस्याही सुटलेल्या नाहीत. या सरकारने लोकांचा तसेच सभागृहाचाही विश्वास गमावला असून हे सरकार अल्पमतात आले आहे.ह्णचोडणकर यांचे असेही म्हणणे आहे की, १६ आमदारांसह विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी तयार असून विधानसभेत कोणत्याही क्षणी बहुमत सिध्द करु शकतो. राज्यपालांकडेही याआधी पक्षाने राज्यातील भाजप आघाडी सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी करणारी निवेदने दिलेली आहेत.ह्णकोणत्याही परिस्थितीत विधानसभा विसर्जित केली जाऊ नये, अशी मागणी करताना तसे निर्देश राष्ट्रपतींनी राज्यपालांना द्यावेत आणि मार्गदर्शनही करावे. कट कारस्थान करुन विधानसभा विसर्जनाची चाल खेळली जाऊ शकते. याआधी पर्रीकर मुख्यमंत्री असताना अशीच चाल खेळून त्यांनी विधानसभा विसर्जन करुन घेतलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. घटनेचा कोणत्याही प्रकारे उपमर्द करु देऊ नका. अशी चाल झाल्यास ती मोडून काढा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.काँग्रेसने याआधी राज्यपालांना चार निवेदने दिली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे पक्षाने आता थेट राष्ट्रपतींनाच साकडे घातले.दरम्यान, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस