शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल विश्वात सायबर धोकेही गुंतागुंतीचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:41 IST

बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये सायबर सुरक्षेवर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा अॅनालिटिक्स आणि क्लाऊड तंत्रज्ञानामुळे डिजिटल विश्व अधिक वेगाने विकसित होत आहे. मात्र, त्याचबरोबर सायबर धोकेही अधिक गुंतागुंतीचे होत आहेत,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी केले. बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये आयोजित 'सीईआरटी इन संवाद २०२६' परिषदेच्या उ‌द्घाटनानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, हे धोके रोखण्यासाठी लवचिक आणि सुरक्षित सायबर संरचना उभारणे ही काळाची गरज आहे'. भारताचा डिजिटल विस्तार झपाट्याने वाढत असताना सायबर सुरक्षेच्या सक्षम आणि जागतिक दर्जाच्या चौकटी उभारणे अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल व्यवहार, ई-गव्हर्नन्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना सायबर हल्ल्यांचा धोका देखील वाढतो. त्यामुळे अशा परिषदांमधून ठोस उपाययोजना आणि धोरणात्मक दिशा मिळणे गरजेचे आहे.'

'सीईआरटी इन संवाद २०२६' परिषद देशातील वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी आयोजित केली होती. देश-विदेशातील ५०० हून अधिक तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि प्रतिनिधी यात सहभागी झाले.

या परिषदेत 'सीईआरटी इन'च्यावतीने काही महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा करण्यात आली. यामध्ये 'ऑडिट मॉनिटरिंग बेंचमार्क अॅण्ड नॉलेज फ्रेमवर्क' या नव्या चौकटीचा शुभारंभ, विविध कार्यगटांच्या प्रगती अहवालाचे सादरीकरण आणि प्रगत सायबर सुरक्षा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात यांचा समावेश होता. हा अभ्यासक्रम नाबार्ड आणि 'बर्ड' यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमांमुळे देशातील सायबर ऑडिट प्रणाली अधिक सक्षम होण्यास मदत होईल. सरकारी व खासगी क्षेत्रातील संस्थांना सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यास दिशा मिळेल, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.

विशेषतः बँकिंग, ग्रामीण वित्तीय संस्था आणि शासकीय यंत्रणांमध्ये सायबर सुरक्षा मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. परिषदेत विविध तांत्रिक सत्रे, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी नव्या पद्धती, आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि धोरणात्मक सहकार्य यांवर सखोल चर्चा झाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cyber threats in digital world complex: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant highlighted the increasing complexity of cyber threats due to advancements in AI and cloud technology. He emphasized the need for robust cyber security frameworks. A conference addressed strengthening cyber security amid rising digital transactions, focusing on auditing, knowledge frameworks, and advanced training programs to secure digital infrastructure.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतcyber crimeसायबर क्राइम