शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

CoronaVirus News in Goa : राज्य सरकारने तयार केलेल्या शिष्टाचार प्रक्रियेला विरोधी आमदारांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 3:00 PM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्यात ‘कोविड १९’ चाचणीचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचा जो दावा करतात तो फसवा असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

ठळक मुद्देदिल्ली किंवा देशाच्या अन्य भागातून ‘कोरोना’च्या हॉटस्पॉटमधूनही येणा-या परप्रांतीयांना कोविड निगेटिव्ह अहवाल आणला की थेट प्रवेश हा कुठला न्याय? असा सवाल केला आहे.

पणजी : गोव्याबाहेरुन येणा-यांसाठी सरकारने तयार केलेली शिष्टाचार प्रक्रियेवर विरोधी आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विदेशातून येणारे खलाशी तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाच पैसे भरुन सात दिवस संस्थात्मक अलगीकरण क्वारंटाइन सक्तीचे आणि दिल्ली किंवा देशाच्या अन्य भागातून ‘कोरोना’च्या हॉटस्पॉटमधूनही येणा-या परप्रांतीयांना कोविड निगेटिव्ह अहवाल आणला की थेट प्रवेश हा कुठला न्याय? असा सवाल केला आहे. 

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई तसेच पक्षाचे अन्य दोन आमदार जयेश साळगांवकर व विनोद पालयेंकर तसेच काँग्रेसी आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांनी मुख्य सचिव परिमल राय यांना निवेदन सादर करुन शिष्टाचार प्रक्रियेत बदल करण्याची व गोव्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया निश्चित करण्याची मागणी केली. या निवेदनावर अपक्ष आमदार रोहन खंवटे यांचीही सही आहे. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, विदेशात जहाजांवर अडकलेले खलाशी आज फार मोठ्या अडचणीत आहेत. त्यांच्या नोक-या गेलेल्या आहेत, असे असतानाही आणि आधी तब्बल दोन महिने क्वारंटाइन राहिले असून गोव्यात आल्यावर त्यांना प्रत्येकी २ हजार रुपये शुल्क आकारुन सात दिवस सक्तीने संस्थात्मक अलगीकरणामध्ये क्वारंटाइन राहावे लागते. उलट देशातील अन्य भागातून येणा-यांना मात्र तीन पर्याय दिले गेलेले आहेत, हा निव्वळ पक्षपात आहे. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्यात ‘कोविड १९’ चाचणीचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचा जो दावा करतात तो फसवा असल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली. सध्याचे प्रमाण पाहता एक हजार व्यक्तीमागे ८ एवढ्याच व्यक्तींची ‘कोविड १९’ चाचणी झालेली आहे, असे ते म्हणाले. ‘कोविड’ सर्वेक्षण हा निव्वळ लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार होता, अशी टीकाही त्यांनी केली. 

दरम्यान, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी लवकरच जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याचे सूतोवाच केले आहे त्याचाही सरदेसाई यांनी समाचार घेतला. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे की निवडणुका? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसी आमदार रेजिनाल्द लॉरेन्स म्हणाले की, ‘ खलाशांना दोन-दोन महिने क्वारंटाइन राहूनही पुन: गोव्यात सक्तीचे ‘पेड क्वारंटाइन’ करायला लावणा-या सरकारने मंत्र्यांनी ४0 दिवस स्वत:च्या केबिनमध्ये क्वारंटाइन राहून दाखवावे. ते म्हणाले की, ‘कोरोनामुळे मध्य पूर्व राष्ट्रांमध्ये हजारो गोमंतकीय अडकलेले आहेत. त्यांना शोधून गोव्यात परत आणण्याचे काम सरकारने प्राधान्यक्रमे करावे.’  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा