शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Shiv Sena Dasara Melava: “हे शिवसेनेचं बदललेलं स्वरुप, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:58 IST

Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठळक मुद्देहे शिवसेनेचं बदललेले स्वरुप असून, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतोठाकरे सरकारने जाहीर केलेले पॅकेज निव्वळ धूळफेकनवाब मलिक हे नैराश्यात आहेत

पणजी: कोरोनाची दुसरी लाट कायम असताना शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) होणार आहे. गतवर्षी मोजकी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आलेला दसरा मेळावा यंदाच्या वर्षी षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिवसेनेचे हे बदललेले स्वरुप असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येणार असे ऐकले. मला वाटते हे शिवसेनेचे बदलते स्वरुप आहे असे समजूया. कारण मजबुरी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत असल्याचे शिवसेना सांगत होती. आता हा प्रयत्न अधिक घट्ट होण्यासाठी असू शकतो, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. फडणवीस सध्या गोवा दौऱ्यावर असून, तेथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

ठाकरे सरकारने जाहीर केलेले पॅकेज निव्वळ धूळफेक

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर झालेले पॅकेज म्हणजे धूळफेक आहे. मागे अकरा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. ते गेले कुठे, त्याचे पैसे कुणाला मिळाले, अशी विचारणा करत या पॅकेजमधील कुठल्या जिल्ह्याला किती पैसे मिळणार आहेत याचीही माहिती नाही. हे सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजना बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. बांधावर जाऊन दिलेले आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना काही देईल, असे वाटत नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले हे केवळ राजकारणासाठी आहे. त्यापलिकडे त्यात वेगळे काही नाही. तसेच नवाब मलिक हे नैराश्यात आहेत. त्यांची निराशा व्यक्त करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गोवा दौरा सरकारी कार्यक्रम जोडून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पक्षालाही मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. अमित शहा यांना मास्टर स्ट्रॅटेजिक मानले जाते. गोव्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा या दौऱ्यामुळे होणार आहे. गोवा आणि राज्यातील निवडणुकांसाठी एकत्रित मेहनत घ्यावी लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.  

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेgoaगोवा