शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर 61 लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:11 IST

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयीची माहिती लेखी स्वरुपात विधानसभेत सादर केली आहे.पूर्वीचे मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावांसह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची माहिती दिली.

पणजी -  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सेवेतील किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्याची संख्या एकूण 151 आहे व त्यांच्या वेतनावर दरमहा 61 लाख रुपयांचा खर्च होतो. याविषयीची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लेखी स्वरुपात विधानसभेत सादर केली आहे.पूर्वीचे मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावांसह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची माहिती दिली गेली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात 23 कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनावर दरमहा 13 लाख 74 हजार 298 रुपये खर्च होतात. विनोद पालयेंकर मंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 6 लाख 12 हजार रुपये खर्च होत असे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सेवेत एकूण 17 कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनावर दरमहा 6 लाख 8 हजार 370 रुपये खर्च होतात. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयात एकूण 15 कर्मचारी आहेत व त्यावर 6 लाख 2 हजार रुपये दर महिन्याला खर्च होतात. 

कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या 14 आहे व त्यांच्या वेतनावर एकूण 5 लाख 29 हजार रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले जातात. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या कार्यालयांमध्ये एकूण 15 कर्मचारी आहेत व त्यांच्या पगारापोटी सरकार 5 लाख 58 हजार रुपये खर्च करते, असे उत्तरावरून स्पष्ट होत आहे. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांच्याकडे फक्त पाचच कर्मचारी आहेत व त्यांच्या वेतनावर सरकार दर महिन्याला 3 लाख 92 हजार रुपये खर्च करते. विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे 11 कर्मचारी होते व त्यांच्या वेतनावर सरकार दरमहा 3 लाख 81 हजार रुपये खर्च करत होते.

विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतूक पोलीस ठेवू - मुख्यमंत्रीराज्यातील विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतुकीची कोंडी होत असेल तर सकाळी व सायंकाळच्यावेळी व दुपारीही वाहतूक पोलीस ठेवण्याची व्यवस्था सरकार करील, असे  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (23 जुलै) विधानसभेत जाहीर केले आहे. काँग्रेसचे नावेली मतदारसंघाचे आमदार  लुइझिन फालेरो यांनी मूळ प्रश्न मांडला होता. नावेली येथे हायस्कुल, हायरसेकंडरी, कॉलेज असलेल्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी आपण वाहतूक सिग्नलची व्यवस्था केली होती. महामार्ग रुंदीकरणावेळी ते सिग्नल काढून टाकले गेले. तिथे आता वाहतुकीची प्रचंड कोंडी होते, असे फालेरो यांनी सांगितले. बांधकाम खात्याकडे अनेकदा पत्र व्यवहार केला तरी प्रश्न सुटला नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी मला चारवेळा प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही दिले होते, असे फालेरो यांनी सांगितले आहे. सिग्नल होईल तेव्हा होईलच पण अगोदर त्या हायस्कुलकडे वाहतूक पोलिसाची सोय करावी, अशीही मागणी फालेरो यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली. वार्का येथेही अशाच प्रकारे वाहतूक कोंडी होते व तिथेही वाहतूक पोलीस असायला हवा, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले. राज्यात ज्या ज्या ठिकाणी विद्यालये आहेत व जंक्शनमुळे वाहतूक कोंडी होते, तिथे वाहतूक पोलीस नियुक्त केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा