शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

धान पीक शेतकऱ्यांना प्रोत्साहन कधी मिळणार ? शासन निर्णयाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:35 IST

Gadchiroli : नोंदणी केली; जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा जीव लागला टांगणीला

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, अजूनपर्यंत शासन निर्णय निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

धान पिकाचे उत्पादन घेण्यासाठी खर्च अधिक येतो. त्या तुलनेत धानाला भाव कमी आहे. त्यामुळे धानाची शेती तोट्याचा व्यवसाय बनत चालला आहे. शेतकरी इतर पिकांकडे वळत चालला आहे. धान उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रति हेक्टरी प्रोत्साहन रक्कम देण्याचे धोरण राज्य शासनाने सुरू केले आहे. केवळ नोंदणी केली तरी प्रोत्साहनपर रक्कम मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हालअपेष्टा सहन करून नोंदणी केली आहे. मात्र, यावर्षी शासनाने याबाबतचा शासन निर्णय अजूनही काढला नाही. 

१४ हजार शेतकऱ्यांची पडली भर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे १४ हजार शेतकऱ्यांनी अधिकार शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी केली आहे. हे सर्व शेतकरी शासनाकडून लाभ मिळतील, अशी अपेक्षा करीत आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लक्ष प्रोत्साहनपर रकमेबाबत राज्य शासनाने अजूनही घोषणा केली नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकडे शेतकरी लक्ष लावून बसले होते. मात्र, त्यात घोषणा झाली नाही. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूर येथील आहेत. त्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांची दशा माहीत आहे. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळत आहे. आता त्यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे. त्यांच्याकडून धान उत्पादकांना अपेक्षा आहेत

८८ हजार हालअपेष्टा सहन करून केली नोंदणीशेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे ४५ हजार ५००, तर मार्केटिंग फेडरेशनकडे ४३ हजार शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. 

"शासनाने सोयाबीन उत्पादकांना मदत केली आहे. तशीच मदत धान उत्पादकांना द्यावी. राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या इतर शेतकऱ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मदत जाहीर करावी."- कल्पेश चुधरी, शेतकरी

"धान उत्पादनाचा खर्च अधिक आहे. त्या तुलनेत थानाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती हा तोट्याचा व्यवसाय बनत चालला आहे. शासनाने धान उत्पादकांना मदत केली नाही तर हे शेतकरी इतर पिकांकडे वळतील. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे." - पुंजीराम डोईजड, शेतकरी

टॅग्स :PaddyभातCropपीकFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोली