शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

धान पीक शेतकऱ्यांना प्रोत्साहन कधी मिळणार ? शासन निर्णयाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:35 IST

Gadchiroli : नोंदणी केली; जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा जीव लागला टांगणीला

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, अजूनपर्यंत शासन निर्णय निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

धान पिकाचे उत्पादन घेण्यासाठी खर्च अधिक येतो. त्या तुलनेत धानाला भाव कमी आहे. त्यामुळे धानाची शेती तोट्याचा व्यवसाय बनत चालला आहे. शेतकरी इतर पिकांकडे वळत चालला आहे. धान उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रति हेक्टरी प्रोत्साहन रक्कम देण्याचे धोरण राज्य शासनाने सुरू केले आहे. केवळ नोंदणी केली तरी प्रोत्साहनपर रक्कम मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हालअपेष्टा सहन करून नोंदणी केली आहे. मात्र, यावर्षी शासनाने याबाबतचा शासन निर्णय अजूनही काढला नाही. 

१४ हजार शेतकऱ्यांची पडली भर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे १४ हजार शेतकऱ्यांनी अधिकार शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी केली आहे. हे सर्व शेतकरी शासनाकडून लाभ मिळतील, अशी अपेक्षा करीत आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लक्ष प्रोत्साहनपर रकमेबाबत राज्य शासनाने अजूनही घोषणा केली नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकडे शेतकरी लक्ष लावून बसले होते. मात्र, त्यात घोषणा झाली नाही. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूर येथील आहेत. त्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांची दशा माहीत आहे. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळत आहे. आता त्यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे. त्यांच्याकडून धान उत्पादकांना अपेक्षा आहेत

८८ हजार हालअपेष्टा सहन करून केली नोंदणीशेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाकडे ४५ हजार ५००, तर मार्केटिंग फेडरेशनकडे ४३ हजार शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. 

"शासनाने सोयाबीन उत्पादकांना मदत केली आहे. तशीच मदत धान उत्पादकांना द्यावी. राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या इतर शेतकऱ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मदत जाहीर करावी."- कल्पेश चुधरी, शेतकरी

"धान उत्पादनाचा खर्च अधिक आहे. त्या तुलनेत थानाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती हा तोट्याचा व्यवसाय बनत चालला आहे. शासनाने धान उत्पादकांना मदत केली नाही तर हे शेतकरी इतर पिकांकडे वळतील. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे." - पुंजीराम डोईजड, शेतकरी

टॅग्स :PaddyभातCropपीकFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोली