शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची विम्यासाठी दोन महिने पायपीट

By admin | Updated: August 24, 2016 02:18 IST

धानोरा तालुक्याच्या चातगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम चातगाव एसबीआय बँकेमध्ये जमा न करता सदर रक्कम धानोरा येथील

एसबीआय अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा : चातगावची रक्कम धानोराच्या शाखेत गडचिरोली : धानोरा तालुक्याच्या चातगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम चातगाव एसबीआय बँकेमध्ये जमा न करता सदर रक्कम धानोरा येथील एसबीआयच्या शाखेत जमा झाली. त्यामुळे चातगावच्या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेसाठी सुमारे दोन महिने पायपीट करावी लागत आहे. एसबीआयच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात चातगाव येथील एसबीआय शाखेतून ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. या परिसरात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांसाठी २४ लाख ९२ हजार २५३ रूपये एवढी रक्कम विमा कंपनीने मंजूर केली. एसबीआय वगळता इतर बँकांकडून विमा काढलेल्या शेतकऱ्यांची विम्याची रक्कम दोन महिन्यांपूर्वीच मिळाली. इतर बँकांमध्ये विम्याची रक्कम मिळायला लागल्यानंतर चातगाव एसबीआय शाखेत विम्याच्या रकमेसाठी शाखेत विचारणा सुरू केली. मात्र विम्याची रक्कम अजुनपर्यंत प्राप्त झाली नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात होते. सातत्त्याने बँकेचा उंबरठा झिजविणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला व शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच बाचाबाची करण्यास सुरूवात केली. तेव्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना जाग आली. त्यानंतर चातगाव व गडचिरोली येथील बँक व्यवस्थापकांनी विमा कंपनीकडे याबाबतची शहानिशा केली असता, सदर रक्कम नांदेड येथील एसबीआय बँक शाखेत चुकीने जमा झाली असल्याचे निदर्शनास आले. पाठपुराव्यानंतर सदर रक्कम गडचिरोली येथील एसबीआय शाखेमध्ये वळती करण्यात आली. गडचिरोली शाखेतूनसुद्धा विम्याची रक्कम चातगावच्या शाखे ऐवजी जमा न करता ती रक्कम धानोरा येथील एसबीआयच्या शाखेमध्ये जमा केली. सदर रक्कम धानोरा येथील शाखेत १२ जुलैपासून पडून होती. एवढा उशिर होऊनही विमा रकमेचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आल्यानंतर रकमेची शोधाशोध करण्याचे काम सुरू झाले. गडचिरोली येथील मुख्य एसबीआय शाखेकडे याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी केल्यानंतर रक्कम चातगाव ऐवजी धानोरा येथील शाखेत जमा झाल्याचा साक्षात्कार बँक कर्मचाऱ्यांना झाला. त्यानंतर धानोरा येथील एसबीआय शाखेत विम्याची रक्कम चातगाव एसबीआयमध्ये वळती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या सर्व बाबीमध्ये विम्याची रक्कम मिळण्यास तब्बल दोन महिन्यांचा उशीर झाला आहे. हीच रक्कम शेतकऱ्यांना रोवणीच्या हंगामापूर्वी मिळाली असती तर शेतकऱ्यांसाठी सोयीचे झाले असते. बँक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकिमुळे विमा रक्कम मिळण्यास तब्बल दोन महिन्यांचा विलंब झाला आहे. यासाठी जबाबदार असलेल्या बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दोन महिने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यावरचे व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे. व्याजाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी आहे.चातगाव परिसरातील शेतकऱ्यांची विम्याची रक्कम नांदेड जिल्ह्यात चुकीने गेली होती. ही रक्कम परत आणण्यात आली. तलाठ्याने चातगाव परिसरातील शेतकऱ्यांचा सर्विस एरिया धानोरा दाखविल्याने ही रक्कम धानोरा शाखेत जमा झाली. सदर चुक लक्षात आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी धानोरा शाखेला पत्र देऊन विम्याची रक्कम चातगाव शाखेत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.- सूर्यकांत फाळके, व्यवस्थापक, एसबीआय गडचिरोली.