शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशनच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा

By admin | Updated: September 15, 2014 00:07 IST

गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता

गडचिरोली : गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता एम. गणेशन यांनी या पूलाचे काम पूर्ण केले. नक्षलवाद्यांनी त्यानंतर त्यांची हत्या केली. गणेशन यांनी बीआरओच्या मार्फत काम करीत असताना या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. आज त्यांच्या बलिदानामुळे एटापल्ली तालुक्यातील अनेक गाव कायमस्वरूपी रस्त्याने जोडली गेली. त्यांच्या या कर्तृत्वाला गडचिरोली जिल्ह्यातील जनता कायम सलाम करीत राहिल. कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय एम. गणेशन यांनी नक्षलवाद्यांच्या या विरोधाला न जुमानता आलदंडी नदीवरील पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण केले. अडंगे व जांभीयागट्टा या दोन पुलाचेही काम त्यांनी त्याचवर्षी पूर्ण केले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची १४ जानेवारी २००६ ला निर्घृण हत्या केली. २६ जानेवारी २००७ ला गणेशनची पत्नी राखी हिला शौर्य चक्र देऊन राष्ट्रपतींनी सन्मानित केले. गणेशन यांचे बलिदान तालुक्याच्या विकासासाठी झाले. मात्र त्यांच्या शौर्यामुळे व चिकाटीमुळे गट्टा ते एटापल्ली हा ३६ किमीचा मार्ग पूर्ण झाला व दोन गावे कायमस्वरूपी एकमेकांशी जोडल्या गेली. गणेशन यांचे नाव एटापल्ली तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. त्यानंतर २००८-०९ मध्ये जिल्ह्यात निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लोकयात्रेने गणेशन यांच्या कुटुंबाची दखल घेऊन त्यांच्या पत्नीचा यात्रा समारोपप्रसंगी सत्कारही केला होता. शासनानेसुद्धा आलदंडी पुलाजवळ अभियंता गणेशन यांचे स्मारक बांधून या पुलाला या शहिदाचे नाव द्यावे, अशी भावना या तालुक्यातील जनतेचीही होती. या पूलावरून वाहतूक सुरू होऊन बरेच वर्ष लोटले. बीआरओनेही गडचिरोली जिल्ह्यातून २०१० मध्ये गाशा गुंडाळला. त्यांच्यामुळे नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात रस्ते व पूल होऊ शकले. त्यानंतर या भागात विकासाचे काम मंदावले. या पूलाला गणेशनचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली होती. परंतु ७ वर्षाचा कालावधी लोटला. सरकारला या गोष्टीचा विसर पडला आहे. १४ जानेवारीला गणेशन यांच्या हत्येला ८ वर्ष पूर्ण झालेत. या पूलामुळे शेकडो गाव जोडल्या गेली. केंद्र सरकारने गणेशनच्या कार्याची दखल घेतली. परंतु महाराष्ट्र शासनाला मात्र त्यांच्या कार्याचा विसर पडला असेच दिसून येत आहे. एकूणच या अभियंत्याचे वीर मरण या जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान देऊन गेले. याशिवाय जिल्ह्यात काम करणाऱ्या अनेक खासगी कंत्राटदार अभियंत्याचीही नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यांचेही योगदान विकाासाठी मोलाचेच ठरले.