शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पाण्याचा निचरा हाेण्यासाठी उपाययाेजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST

आरमाेरी : काही दिवसांतच पावसाळ्याला सुरवात हाेणार आहे. त्यामुळे शहरातील प्रभाग १ मधील ओम साईनगर व गायत्री नगरात दरवर्षी ...

आरमाेरी : काही दिवसांतच पावसाळ्याला सुरवात हाेणार आहे. त्यामुळे शहरातील प्रभाग १ मधील ओम साईनगर व गायत्री नगरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका गीता सेलाेकर यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आरमाेरीच्या प्रभाग १ मधील ओम साईनगर व गायत्रीनगरात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने बेटाचे स्वरूप प्राप्त हाेते. नगरातील अनेक नागरिकांच्या घरी पाणी शिरते. साचणाऱ्या पाण्याचा याेग्यप्रकारे निचरा हाेत नसल्याने तसेच या भागात रानतलाव असल्याने त्याचा सलंग नगराच्या भागाकडे देण्यात आला आहे. सलंगामधून पाणी साेडल्यानंतर हे पाणी दाेन्ही नगरात येते. त्यामुळे नगरातील पाणी कुठे जाणार, यासाठी रानतलावाच्या बाजूला दिलेला सलंग बंद करून काळा गाेटाच्या बाजूने असलेल्या नहराच्या बाजूने पाणी काढण्याची व्यवस्था करावी. यासाठी पावसाळा सुरू हाेण्यापूर्वी उपाययाेजना करावी. तसेच डाॅ. पिलारे यांच्या दवाखान्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कचरा व झुडपे आहेत. या नाल्यातील गाळाचा उपसा लवकर करून दाेन्ही नगरातील नागरिकांची समस्या साेडवावी, अशी मागणी नगरसेविका सेलाेकर यांनी केली आहे.