शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व सचिवावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:01 IST

तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे.

बीडीओंना निवेदन : नारायणपूर व अमरावती गावातील नारिकांची मागणी
सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी स्वत:च्याच मर्जीने कारभार हाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. परिणामी येथील सरपंच व सचिव यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नारायणपूर व अमरावती येथील नागरिकांनी सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
एप्रिल २०१५ मध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी सरपंचपदावर भुदेवी दुर्गया गावडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदावर एम. एल. मेश्राम हे मागील एक वर्षांपासून कार्यरत आहेत. गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी सरपंच व सचिव दोघेही आपल्या मनमर्जीने खर्च करीत आहेत. कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर झाला, किती निधी खर्च झाला व किती शिल्लक आहे, याचा हिशेब आमसभेत ठेवत नाही. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाकरिता सचिव अनुपस्थितीत होते. १५ आॅगस्ट रोजीची तहकूब झालेली आमसभा १६ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आली होती. जवळपास २०० नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान घरकूल आवास योजनेवर नागरिक प्रश्न विचारणार असल्याचे बघून सचिवांनी ग्रामसभा तहकूब केली व निघून गेले. १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये ठेवण्यात आलेली विषय सूची न ठेवता फक्त घरकूल हा एकच विषय ठेवण्यात आला होता. नियमाप्रमाणे १५ आॅगस्टच्या आमसभेमध्ये जेवढे विषय ठेवण्यात आले होते, तेवढेच विषय त्यानंतरच्या ग्रामसभेमध्ये ठेवणे गरजेचे होते.
सरपंच व सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे नारायणपूर तसेच अमरावती गावाचा विकास रखडला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सिरोंचाचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी नागराजू नानय्या इंगीली, अशोक येलय्या इंगीली, गट्टू शिवनारायण चम्माकारी, रमेश येलय्या दाया, अशोक समय्या आरे, ओदयालू भिमय्या नसकुरी आदी उपस्थित होते.