शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागड यात्रा दारू व तंबाखूमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड येथे ५ जानेवारीपासून ठाकूरदेव यात्रा भरणार आहे. आदिवासी समाजात या यात्रेला फार महत्त्व आहे. जिल्ह्यातीलच ...

एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड येथे ५ जानेवारीपासून ठाकूरदेव यात्रा भरणार आहे. आदिवासी समाजात या यात्रेला फार महत्त्व आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने यात्रेसाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती, स्थानिक जनता व मुक्तिपथ संयुक्तरित्या प्रयत्न करणार आहे.

सूरजागड येथील देवस्थानात तीन दिवस ठाकूर देवाची यात्रा भरली जाते. ठाकूरदेवाचे मंदिर आदिवासींचे दैवत आहे. सूरजागड पट्टी परिसरातील ४० गावातील प्रमुख, भूमिया, पुजारी, पोलीसपाटील, सरपंच हे सर्व गावापासून ५ किमी अंतर पायी पहाडी चढून ठाकूरदेवाची पूजाअर्चा करतात. या ठिकाणी अद्यापही मातीचे तुटलेले घोडे व काही मूर्ती कायम आहेत. आदिवासींसोबत बिगर आदिवासी लोकही या पहाडीवर उत्साहापोटी चढतात. या पहाडीवरून दिसणारे दृश्य मनमोहक आहे. त्यामुळे यात्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. धार्मिक ठिकाणी कुणीही दारू किंवा खर्रा सेवन करून येऊ नये, यासाठी सूरजागड येथील यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती व परिसरातील जनतेच्या सहकार्याने मुक्तिपथ अभियानातर्फे सलग तीन दिवस जनजागृती करण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी बॅनर तसेच व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून दारू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम सांगत सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बैठकीला सूरजागड पारंपरिक गाेटूल समितीचे अध्यक्ष सैनू गाेटा यांच्यासह इलाक्यातील सदस्य व मुक्तिपथ कार्यकर्ते उपस्थित हाेते.

बाॅक्स ..........

गाेटूल समिती ठाेठावणार दंड

विदर्भात प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा यात्रा, चपराळा यात्रा दारू व तंबाखूमुक्त भरत आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांचे महत्त्वाचे स्थान असलेले सूरजागड येथील ठाकूरदेव यात्रादेखील शांततेत पार पाडण्यासाठी खर्रा व दारूमुक्त करण्यात येणार आहे. परिसरातील सर्वच गावे आदिवासीबहुल असल्याने गावठी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जाते. काहीजण दारूची विक्रीदेखील करतात. अशा विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी व कुणीही दारू पिऊन यात्रेचे पावित्र्य भंग करू नये, यासाठी दारूमुक्त यात्रा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात ठराव घेण्यात आला असून, स्वयंसेवकांची निवडसुद्धा करण्यात आली आहे. नियम न पाळता खर्रा व दारुविक्री करणाऱ्यांवर गाेटूल समितीतर्फे दंड ठाेठावला जाणार आहे.