शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा विद्यार्थ्यांवर अडल्या

By admin | Updated: July 18, 2014 00:05 IST

बालकांना सक्तीचे शिक्षण कायदा २०१३ च्या नियमानुसार जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ व वर्ग ८ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. गावकऱ्यांनी देखील मोठा गाजावाजा करीत नवीन वर्ग सुरू केले.

जि. प. शाळांची स्थिती : विद्यार्थी एका तर टीसी दुसऱ्या शाळेतदेसाईगंज : बालकांना सक्तीचे शिक्षण कायदा २०१३ च्या नियमानुसार जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ व वर्ग ८ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. गावकऱ्यांनी देखील मोठा गाजावाजा करीत नवीन वर्ग सुरू केले. मात्र सुज्ञ पालकांना उच्च शिक्षणाकरिता दुसऱ्या शाळेत जाण्यास जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी मज्जाव केला आहे. तसेच कार्यरत शाळेत स्वत:चे पद कायम ठेवण्याचाही आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. यावर जिल्ह्यातील शिक्षण विभागाने चुप्पी साधली आहे. बालकांना सक्तीचा शिक्षण कायदा २०११ च्या निकषानुसार वर्ग ५ वी करिता १ किमी व वर्ग ८ वीकरिता ३ किमी अंतराची अट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता ५ वी व ८ वीचे नवीन वर्ग सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील जि. प. शाळांची गुणवत्ता पाहता, उच्च शिक्षणाकरिता आलेल्या वर्ग ५ वी किंवा ८ वीच्या विद्यार्थ्यांना सुरूवातीपासून अ, ब, क चे शिक्षण द्यावे लागते, अशी दयनिय अवस्था जिल्हा परिषद शाळांची सध्यस्थितीत झाली आहे. याला काही शाळा अपवादही असतील तरी ६० टक्के शाळांमध्ये सदर परिस्थिती दिसून येत आहे. खासगी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा पूर्ववत पाया मजबूत करण्यात शिक्षकांचा वेळ जातो. जिल्ह्यातील कित्येक शाळा दोन किंवा तीन शिक्षकी आहेत. वर्ग ५ व शिक्षक ३ अशी स्थिती अनेक शाळांमध्ये पहावयास मिळते. त्यापैकी एक शिक्षकी शाळेतील शिक्षक नेहमीच लिखानाच्या कामात व्यस्त असतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. परिणामी अभ्यासक्रम संपूर्ण शैक्षणिक सत्रात पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाअभावी अनेक अडचणी परीक्षेदरम्यान जाणवतात. त्यामुळेच जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरीही नवीन कायद्यानुसार वर्ग ५ व ८ वर्ग घेण्यास गावातील पुढाऱ्याच्या पाठिंब्यामुळे शिक्षक धजावत आहेत. जिल्हा परिषद शाळेतून इयत्ता चवथीमधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच गावातील खासगी शाळेमध्ये विद्यार्थी जातात. मात्र नवीन कायद्यामुळे खासगी शाळेतील वर्ग ५ च्या तुकडीला विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे. पाल्यांना शिक्षण कुठे द्यायचे हा संबंधित पालकांचा हक्क आहे. त्यांचा वैयक्तिक प्रश्नही आहे. घटनेने तसे स्वातंत्र्यदेखील दिलेले आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेत स्वत:चे पद कायम राखण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पालकांना टीसी देण्यास मज्जाव करीत आहेत. त्यामुळेच टीसी एका शाळेत तर विद्यार्थी दुसऱ्या शाळेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील बोडधा येथे इयत्ता ८ वी रावनवाडी येथे इयत्ता ५ वा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना टीसी देण्यास नकार दिला आहे. वरिष्ठांकडे तक्रार देऊनही कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हीच स्थिती जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही दिसून येत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील काही पदवीधर शिक्षक स्वत:चे पद कायम ठेवण्यासाठी टीसी देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)