शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यातून शासन लोकांच्या दारी

By admin | Updated: April 11, 2017 01:01 IST

नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.

पोलिसांचा पुढाकार : दुर्गम भागात २००५ पासून ११३७ जनजागरण मेळावे गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य जनतेचा सरकार व पोलिसांप्रती विश्वास वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. २००५ पासून ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ११३७ जनजागरण मेळाव्यातून पोलीस प्रशासनाने हजारो लोकांशी संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात नक्षलवादी कारवायांच्या उदय झाला. याचा थेट परिणाम विकास प्रक्रियेवर झाला. सुरुवातीच्या काळात दुर्गम व अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या विचारांना समर्थन देणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र कालांतराने सरकार व पोलीस यंत्रणेने लोकांशी संवाद वाढविला. यासाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी अशा आयुधांचा वापर केला जाऊ लागला. गडचिरोली या मागास जिल्ह्यात पोलीस हे प्रशासनच मुख्य अंग आहे. त्यामुळे पोलिसांनी या कामात पुढाकार घेतला. २००५ मध्ये ९९, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये ४१, २००८ मध्ये २२, २००९ साली ४२, २०१० मध्ये ९, २०११ मध्ये २०, २०१२ मध्ये ५२, २०१३ मध्ये २१३, २०१४ मध्ये १७९, २०१५ मध्ये २१६, २०१६ मध्ये १९६ व २०१७ मध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत ९ जनजागरण मेळावे पार पडले. या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महसूल प्रशासनाच्या अनेक प्रमाणपत्रांचे वाटप नागरिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. आरोग्य, वन, आदिवासी विकास, पशुसंवर्धन आदी विभागाच्या योजनांची माहिती देऊन त्याचे अर्जही या मेळाव्यातून लाभार्थ्यांकडून भरून घेतले जाऊ लागले. तसेच गावातील तरूण युवक, युवतींसाठी क्रीडा स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन अलिकडच्या काळात जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून केले जाऊ लागले आहे. मेळाव्यात नागरिकांना संसारोपयोगी साहित्यांचेही वितरण केले जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही काही जनजागरण मेळाव्यांना हजेरी लावून लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सोबत राहून विकास प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले.जनजागरण मेळाव्याच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण भागात नक्षलवाद्यांचा दबाव कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जनजागरण मेळावे व एकूण सोशल पोलिसिंग हे पोलीस यंत्रणेचा कणा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)