शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारीचा यूटर्न शेतकऱ्यांच्या मुळावर

By admin | Updated: October 3, 2015 01:16 IST

सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने प्रथमच ६७ पैसेपेक्षा अधिक व कमी असलेल्या गावांची माहिती मागितली होती

५० च्या खाली असलेल्यां गावांनाच मिळणार लाभ : १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या वर ; सुधारित मागितली माहिती

लोकमत विशेषगडचिरोली : सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने प्रथमच ६७ पैसेपेक्षा अधिक व कमी असलेल्या गावांची माहिती मागितली होती. या नवीन पद्धतीनुसार सुमारे ८० टक्के गावे दुष्काळग्रस्त घोषित करून त्यांना त्याप्रमाणे सोयीसवलती उपलब्ध करून द्याव्या लागतील, ही बाब लक्षात आल्यानंतर शासनाने युटर्न घेत जुन्या प्रमाणेच पैसेवारीचा घोषवारा पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नवीन निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील पिकांची स्थिती लक्षात येण्याच्या उद्देशाने सप्टेंबर महिन्यात महसूल विभागाच्या मार्फतीने पाहणी करून पैसेवारी जाहीर केली जाते. यापूर्वी ५० पैसेपेक्षा कमी व जास्त असलेल्या गावांची पैसेवारी जाहीर केली जात होती. बहुतांश गावांची पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा अधिक राहत असल्याने या गावाला दुष्काळाच्या काळात सरकारकडूून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. त्याचबरोबर त्या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळ जाहीर केला जात नव्हता. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनानुसार राज्य शासनाने यावर्षी प्रथमच ६७ पैसेपेक्षा अधिक व कमी असलेल्या गावांचा गोषवारा मागितला होता. या नवीन पद्धतीनुसार राज्यातील ८० टक्क्याहून अधिक गावांची पैसेवारी ६७ टक्क्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले. नवीन नियमानुसार या सर्व गावांना दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळात राबवायच्या योजना या गावांमध्ये राबवाव्या लागल्या असत्या. त्यामुळे शासनावरील आर्थिक भार आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्हा प्रशासनाला आठ दिवसांतच नवीन आदेश निर्गमित करून ५० पैसेपेक्षा कमी व अधिक असलेल्या गावांची यादी मागितली आहे. सदर नियम शेतकऱ्यांच्या मुळावर बसण्याची शक्यता आहे. ५० टक्क्याच्या पैसेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ६८८ गावांपैकी केवळ ३६७ गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. तर सुमारे १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास केवळ ३६७ गावांनाच दुष्काळग्रस्त घोषित करून तेथील शेतकऱ्यांना सवलती पुरविल्या जातील. त्यामुळे शासनाचा नवीन नियम शेतकऱ्यांच्या मूळावर बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाच्या या धोरणाबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)नवीन पद्धतीमुळे गावांची संख्या घटलीयापूर्वीच्या नजरअंदाज पाहणीत १ हजार ४४२ गावांची पैसेवारी ६७ पैशांपेक्षा कमी होती. तर फक्त १० गावांची पैसेवारी ६७ पैशांपेक्षा जास्त होती. यानुसार १ हजार ४४२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून पात्र ठरली असती व त्यानुसार सोयीसवलती शासनाला राबवाव्या लागल्या असत्या. मात्र नवीन ५० पैसेवारीत केवळ ३६७ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असून १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे.