नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल रोजी तर विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान झाले. नक्षली आव्हानांना न जुमानता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीवरील विश्वास सिद्ध केला. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि विशेषत: पोलीस यंत्रणे ...
आरमोरी बर्डी परिसरात मुख्य महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. सदर मार्गाच्या खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे शहरात ऐन हिवाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांना त्रास सहन ...
हलके व मध्यम कालावधीचे धान कापले होते. जड धान निसवले होते. अशावेळी आठ दिवस दमदार पाऊस झाला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे धान कोसळले तर कापलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. यामुळे सर्वच धानाचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून ...
जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नगराध्यक्षांच्या वाहनाचा खर्च म्हणून ११ लाख १० हजार १३२ रुपये तर मुख्याधिकारी यांच्या वाहनाचे जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील खर्च ३ लाख ३३ हजार ९६ रुपयांची देयक सादर करण्यात आले. ...
समग्र शिक्षा या राज्य शासनाच्या प्रकल्पात २००१ पासून सुमारे सहा हजार कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. सदर कर्मचारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, शासनाच्या योजना राबविणे, आदी कामे करीत आहेत. हे ...
हिवाळा हा आरोग्यासाठी शक्तीवर्धक ऋतू मानला जातो. पहाटेच्या गुलाबी थंडीत शारीरिक कसरत करण्याचे अनेक फायदे असल्याने सूर्य उगवण्यापूर्वी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गावर नागरिकांची रांग लागते. काही नागरिक तर पहाटेलाच घराबाहेर पडत होते. मात्र यावर्षी वा ...
पुलावर खड्डे पडले असून लोखंडी सलाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्ता व पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी देशपूर, कुरंजा, देवीपूर आदी गावातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्गावर दोन ते ...
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरी येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावाबाहेर असणाऱ्या विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात आणण्यासाठी उंच ठिकाणी ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आ ...