शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार क्विंटल मक्याचे चुकारे मिळालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकअंतर्गत धानोरा येथे आधारभूत मका खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी मागील वर्षी करण्यात आली. शासनाने ...

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकअंतर्गत धानोरा येथे आधारभूत मका खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी मागील वर्षी करण्यात आली. शासनाने मका खरेदीची मुदतवाढ ३१ जुलै २०२० पर्यंत दिली होती. त्याप्रमाणे १६ शेतकऱ्यांनी ३० जुलै राेजी संकलन केंद्र धानोरा येथे १०५३.६६ क्विंटल मका विक्री केला. त्याचे रितसर बिल शेतकऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करून मक्याची विक्री केली. परंतु तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण दाखवून शासनाने ३० जुलै राेजी खरेदी बंद केली. शेतकऱ्यांनी माेठ्या मेहनतीने मक्याचे उत्पादन घेतले. परंतु त्यांना विविध कारणे दाखवून मक्याचे चुकारे देण्यात आले नाही. धानाेरा तालुक्यातील मयाळू मडावी, मलापसिंग मलिया, अर्पित तुलावी (रा. पन्नेमारा), प्रमेन्द सहारे येरकड, जयंती लकडा, आनंदाबाई गावडे पळसगाव-पेंढरी, गांडो आतला, मतरू टेकाम मोहगाव पेंढरी, रजनी वरखडे निमगाव, जनीबाई मातलमी वडगाव, दानू तुलावी (रा. ढवळी, नरेश चिमुरकर, सुधीर भुरसे धानोरा, चमरू समरथ पयडी, मंगेश आतला मोहगाव, मेहताब मंगल कुदराम (रा. झाडापापडा) आदी शेतकऱ्यांचे मक्याचे चुकारे रखडले आहेत. यासंदर्भात उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक डी. एस. चाैधरी यांची विचारणा केली असता, शेतकऱ्यांच्या मक्याचे चुकारे मिळावेत यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले.

बाॅक्स

मुदत संपली तर काटा कसा केला?

धानाेरा तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी मागील वर्षी मक्याची विक्री आधारभूत केंद्रावर केली हाेती. परंतु चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. शेतकरी जेव्हा आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चुकारे देण्याची मागणी करतात, तेव्हा अधिकारी मका घरी घेऊन जाण्यास सांगतात. मका खरेदीची शासनाची मुदत संपली होती, तर केंद्रावर मक्याचा काटा केला कसा? बिल बनले कसे? उद्दिष्टापेक्षा खरेदी केलीच कशी? याला जबाबदार कोण? मुदतीत ऑनलाइन लॉट एन्ट्री करणे आवश्यक होते. परंतु ही सर्व प्रक्रिया पार पाडणारे अधिकारी आदिवासी विकास महामंडळाचेच हाेते. शेतकऱ्यांना चुकारे न मिळण्यास जबाबदार काेण? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे रखडलेले चुकारे व्याजासह द्यावे, अशी मागणी शेतकरी रजनी वासुदेव वरखडे यांनी केली आहे.