शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

संस्कार केंद्राची अवदशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:09 IST

चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.

ठळक मुद्देपुन्हा सुरू करण्याची गरज : सिरोंचातील अनेकांचे आयुष्य घडविले

आनंद मांडवे।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.६० च्या दशकात सय्यद सत्तारचाचा यांच्या मालकीच्या दोन खोल्यांमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले होते. या संस्कार केंद्रामध्ये शासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमला होता. संस्कार केंद्रातील संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जात होता. त्यामुळे सिरोंचासह परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी येत होते. दिवस-रात्रभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल राहत होती. या संस्कार केंद्राने अनेकांचे आयुष्य घडविले आहे. काही कालावधीनंतर तहसील कार्यालयाच्या परिसरातील ब्रिटीशकालीन आॅफिसर्स क्लबमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. त्यालगतच्या पटांगणात सिंगल बार, डब्बल बार हे व्यायाम प्रकार दिसत होते. व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, कबड्डी यासारखे मैदानी सामने सुद्धा रंगत होते. बुद्धीबळाचे डाव इमारतीच्या वºहांड्यात जमू लागले. बुद्धीबळाची जागा काही दिवसांनी रमीने घेतली. त्यामुळे राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडा यांची जागा किंग, राणी, गुलाम, एक्का, नहला, दहला यांनी घेतली. रमी खेळतानाही रम कधी आली हे कळलेच नाही. रम, रमीचे डाव रंगत असताना तहसील कार्यालयाच्या परिसरातील संस्कार केंद्र मालगुजारी बंगल्याजवळ स्थानांतरित झाले. मात्र काही दिवसातच शासनाने दिलेला कर्मचारी काढून घेतला. संस्कार केंद्रासाठी मिळणारा निधी बंद केला. तेव्हापासून संस्कार केंद्राची अवदशा सुरू झाली.सदैव शुभ्र वस्त्रे परिधान करून संपूर्ण गावाला आदर्शाचे धडे देणाºया शांताराम बापूंच्या पिंजरातील उत्तरार्धातल्या श्रीधरपंत गुरूजींसारखी त्याची अवस्था झाली. खप्पड चेहऱ्यावर वाढलेल्या दाढीप्रमाणे आता संस्कार केंद्रावर झाडी उगवल्या आहेत. पांढºया फटक भिंती बेवड्यांच्या लक्तरांसारख्या मळकट झाल्या आहेत. बेवारस कुत्रे, मांजर, उंदीर, घुशींचे आश्रयस्थान बनले आहे. वºहांड्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. युवा मंडळींनी विरंगुळ्यासाठी आता कालेश्वराची वाट धरली आहे. त्यामुळे या संस्कार केंद्राकडे दुर्लक्ष झाले आहे.आयुष्य घडलेल्यांचे डोळे पाणावतातसंस्कार केंद्रातून शिस्तीचे बाळकडू मिळाल्याने जीवनात यशस्वी झालेल्या नागरिकांना संस्कार केंद्रातील दिवस अजूनही आठवतात. यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ध्यैर्य, चिकाटी, सहनशीलता याच संस्कार केंद्राने शिकविले. संस्कार केंद्रामुळे आपण प्रगती साधली, मात्र संस्कार केंद्राची अवदशा बघून त्यांच्या डोळे पाणावतात.संस्कार केंद्रात दारूमुक्तीचेही धडे दिले जात होते. या केंद्रामुळे शेकडो नागरिकांनी दारूला रामराम ठोकून उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचविले.