शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

संस्कार केंद्राची अवदशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:09 IST

चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.

ठळक मुद्देपुन्हा सुरू करण्याची गरज : सिरोंचातील अनेकांचे आयुष्य घडविले

आनंद मांडवे।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.६० च्या दशकात सय्यद सत्तारचाचा यांच्या मालकीच्या दोन खोल्यांमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले होते. या संस्कार केंद्रामध्ये शासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमला होता. संस्कार केंद्रातील संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जात होता. त्यामुळे सिरोंचासह परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी येत होते. दिवस-रात्रभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल राहत होती. या संस्कार केंद्राने अनेकांचे आयुष्य घडविले आहे. काही कालावधीनंतर तहसील कार्यालयाच्या परिसरातील ब्रिटीशकालीन आॅफिसर्स क्लबमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. त्यालगतच्या पटांगणात सिंगल बार, डब्बल बार हे व्यायाम प्रकार दिसत होते. व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, कबड्डी यासारखे मैदानी सामने सुद्धा रंगत होते. बुद्धीबळाचे डाव इमारतीच्या वºहांड्यात जमू लागले. बुद्धीबळाची जागा काही दिवसांनी रमीने घेतली. त्यामुळे राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडा यांची जागा किंग, राणी, गुलाम, एक्का, नहला, दहला यांनी घेतली. रमी खेळतानाही रम कधी आली हे कळलेच नाही. रम, रमीचे डाव रंगत असताना तहसील कार्यालयाच्या परिसरातील संस्कार केंद्र मालगुजारी बंगल्याजवळ स्थानांतरित झाले. मात्र काही दिवसातच शासनाने दिलेला कर्मचारी काढून घेतला. संस्कार केंद्रासाठी मिळणारा निधी बंद केला. तेव्हापासून संस्कार केंद्राची अवदशा सुरू झाली.सदैव शुभ्र वस्त्रे परिधान करून संपूर्ण गावाला आदर्शाचे धडे देणाºया शांताराम बापूंच्या पिंजरातील उत्तरार्धातल्या श्रीधरपंत गुरूजींसारखी त्याची अवस्था झाली. खप्पड चेहऱ्यावर वाढलेल्या दाढीप्रमाणे आता संस्कार केंद्रावर झाडी उगवल्या आहेत. पांढºया फटक भिंती बेवड्यांच्या लक्तरांसारख्या मळकट झाल्या आहेत. बेवारस कुत्रे, मांजर, उंदीर, घुशींचे आश्रयस्थान बनले आहे. वºहांड्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. युवा मंडळींनी विरंगुळ्यासाठी आता कालेश्वराची वाट धरली आहे. त्यामुळे या संस्कार केंद्राकडे दुर्लक्ष झाले आहे.आयुष्य घडलेल्यांचे डोळे पाणावतातसंस्कार केंद्रातून शिस्तीचे बाळकडू मिळाल्याने जीवनात यशस्वी झालेल्या नागरिकांना संस्कार केंद्रातील दिवस अजूनही आठवतात. यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ध्यैर्य, चिकाटी, सहनशीलता याच संस्कार केंद्राने शिकविले. संस्कार केंद्रामुळे आपण प्रगती साधली, मात्र संस्कार केंद्राची अवदशा बघून त्यांच्या डोळे पाणावतात.संस्कार केंद्रात दारूमुक्तीचेही धडे दिले जात होते. या केंद्रामुळे शेकडो नागरिकांनी दारूला रामराम ठोकून उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचविले.