शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

राब जाळण्यातून जंगलाची हाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे. गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून मौल्यवान सागवान आहे.

ठळक मुद्देलाखो रुपयांचा महसूल बुडाला : नवीन रोपवनाच्या प्रक्रियेपूर्वी होते कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. यातील बरेचशे जंगल वनविभागाकडे तर काही जंगल वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. नवीन रोपवन प्रक्रिया राबविण्यापूर्वी जुने जंगल निष्काषित करून राब जाळण्याच्या कार्यवाहीदरम्यान मौल्यवान लाकडे जळून खाक होतात. या प्रक्रियेमुळे आरमोरी तालुक्यातील अनेक ठिकाणचे जुने जंगल नष्ट होत आहे.गडचिरोली जिल्हा हा वनांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून मौल्यवान सागवान आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट सागवानाला राज्यभरात मोठी मागणी आहे. मात्र वनविभाग व एफडीसीएमच्या नियोजनशून्य कारभारामुळे जंगलाचे क्षेत्र कमी होताना दिसून येत आहे. आरमोरी तालुक्यातील सालमारा बिटात वनविकास महामंडळाच्या वतीने पोेर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत जंगल निष्कासनाचे काम करण्यात आले. नवीन रोपवन प्रक्रिया करण्यापूर्वी राब जाळण्याच्या कामात झाडाच्या टाकाऊ फांद्या काडीकचऱ्यासोबत वाहतूक करताना जागेवरच राहिलेले इमारतीसाठी उपयुक्त मौल्यवान लाकडे सर्रास जाळली जातात. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतो.पोर्ला एफडीसीएम परिक्षेत्राअंतर्गत सालमारा बिटातील कक्ष क्र.३७ मध्ये ३० हेक्टर आर जागेत जंगलात निष्कासनाचे काम करण्यात आले. यातील काही काम मजुरांमार्फत तर अर्ध्यापेक्षा अधिक काम कर्वत यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले. सदर काम ठेका पद्धतीने करण्यात आले. खुटाजवळील जागेवरील बिजा, येन या मौल्यवान प्रजातीचे इमारती लठ्ठे व बिट उचलताना ट्रॅक्टरधारकांना अडचण निर्माण झाली. त्यानंतर किमती माल जागेवरच राहिल्याचे दिसून आले. निष्कासनाचे काम झाल्यानंतर रोपवन लागवडीपूर्वी संपूर्ण ३० हेक्टर क्षेत्रावरील काडीकचरा राब जाळून स्वच्छ करावा लागतो. पावसापूर्वी रोपवन क्षेत्र तयार करण्यासाठी इमारती लठ्ठे व जळाऊ बिट जाळले जाते.कक्ष क्रमांक ३७ चे वनरक्षक मडावी यांना कालच सूचना दिली होती. राब जलाई बंद करून सर्वप्रथम संपूर्ण लाकडी माल कुपाच्या बाहेर काढावे. पुन्हा आज हीच सूचना दिली आहे.- के.एन.यादव, वनपरिक्षेत्राधिकारी(एफडीसीएम), पोर्लाकर्मचाऱ्यांवरच जबाबदारीमुख्य डेपोवर लाकडी लठ्ठ्याची वाहतूक केल्यानंतर जळाऊ बिटामध्ये घट येऊ नये, यासाठी मजुराच्या मोजमापात अधिकचा माल घेऊन शोषण केले जाते. संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी स्वत: जंगल निष्कासन क्षेत्रात फारसे फिरकून पाहात नाही. परिणामी वनपाल व वनरक्षक आपल्या मनमर्जीने ही कामे करीत असतात. सरपणासाठी लाकडे तोडली तर सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते. मात्र वनकर्मचाºयाला अभय दिले जाते.

टॅग्स :forestजंगल