शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

माेबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क पाण्याच्या टाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:28 IST

एटापल्ली : बातमीचे शीर्षक वाचून विश्वास बसणार नाही; परंतु मोबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क गावातील पाण्याच्या टाकीवर, अगदी शेवटच्या मजल्यावर ...

एटापल्ली : बातमीचे शीर्षक वाचून विश्वास बसणार नाही; परंतु मोबाईल कव्हरेजकरिता मुले चक्क गावातील पाण्याच्या टाकीवर, अगदी शेवटच्या मजल्यावर चढत आहेत. हा धक्कादायक प्रकार बघून आश्चर्याचा धक्का बसताे. अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

एटापल्ली तालुक्यात फक्त बीएसएनएलची माेबाईल सेवा आहे. तेही तालुक्यातील काही माेजक्याच गावात कव्हरेज मिळते. कव्हरेजची अडचण असली तरी, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. मग कसे कव्हरेज मिळेल, याकरिता मुले वाट्टेल ती शक्कल लढवतात. एटापल्लीपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या येमली गावात पाण्याच्या टाकीवर कव्हरेज मिळण्याकरिता बांबू बांधून राऊटर बसविले आहे.

रविवारी येमली गावात अल्पवयीन सहा मुले-मुली चक्क पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पहायला मिळाले. यापैकी एक मुलगी व मुलगा पाण्याच्या टाकीच्या सर्वात उंच भागावर चढले होते. सदर प्रतिनिधी फोटो घेत असल्याचे लक्षात येताच ते सर्वजण घाईत खाली उतरू लागले. टाकीवर कशाला चढले होते? असा प्रश्न विचारला असता, सर्व मुले घाबरली. काहीच उत्तर न देता ती लगेच पसार झाली. परंतु हा सर्व प्रकार धक्कादायक होता.

सदर प्रतिनिधीने सर्व प्रकार सरपंच ललिता मडावी यांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी गावातील काही युवकांनी पाण्याच्या टाकीवर मोबाईल कव्हरेजकरिता बांबू बांधल्याचे सांगितले व येथून पुढे पाण्याच्या टाकीवर लहान मुले चढणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे सांगितले.

(बाॅक्स)

टाकीला संरक्षक भिंतीची गरज

शहरातील पाण्याच्या टाक्यांना संरक्षक भिंत किंवा काटेरी कुंपण केलेले असते. ग्रामीण भागातील पाण्याच्या टाक्या मात्र माेकळ्याच राहतात. त्यामुळे काेणीही सहज पाण्याच्या टाकीवर चढू शकतो. ग्रामीण भागातील टाक्यांनाही संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. तीन दिवसांपासून एटापल्ली येथे मोबाईल कव्हरेजची समस्या आहे. दिवसातून अनेकवेळा कव्हरेज जाते. बीएसएनएलने सेवेत सुधारणा करण्याची गरज आहे.