शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

काळागोटा मार्गावरून चिखल व खड्ड्यातून सुरू आहे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST

आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डांबर उखडल्याने या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्दे आरमोरी नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष : पाच वर्षापूर्वी केलेले डांबरीकरण अल्पावधीत उखडल्याने वाहनधारकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरातून काळागोटा वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारक व पादचाऱ्यांना चिखल व खड्ड्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डांबर उखडल्याने या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यात पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहते व त्यामुळे या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डबक्यांमुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्गालगत असलेल्या घरातील नागरिकांना दिवस-रात्र घरासमोरील चिखल तुडवित वाट काढावी लागते. या मार्गावरील नरेंद्र निंबेकर यांच्या घरासमोर संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ता नेमका कोणत्या बाजूने चांगला आहे हे कळायला मार्ग नाही. दरवर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्याची अशीच स्थिती असते.गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डे खोल असल्याने खड्ड्यातील पाणी वाहून जात नाही. संपूर्ण रस्ता चिखलाने माखला असल्याने पादचाºयांना चिखल तुडवित आवागमन करावे लागत आहे. दिवसभर या रस्त्यावर लोकांचे आवागमन सुरू असते. मात्र न. प.चे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी काळागोटा परिसरातील नागरिकांनी केली आहे.नवेगावच्या साईनगरात चिखलाचे साम्राज्यगडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील साईनगर वॉर्डातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. या चिखलाच्या रस्त्याने जाताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने या वॉर्डात कच्चा रस्ता तयार केला. या मार्गावर एचपी गॅसचे गोदाम आहे. या गोदामात ट्रकने सिलिंडर नेले जातात. वजनी ट्रकमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच चिखलही निर्माण झाले आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाची रिपझिप सुरू आहे. यामुळे चिखलाचे प्रमाण आणखी वाढले आहे. चिखल एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे की, पायदळ चालणे कठीण झाले आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पक्का रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात प्रशासनाने नियोजन करून रस्ता दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक