शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:02 IST

दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवैरागड परिसरात उद्रेक : शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सुरुवातीला अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धानाची सर्वच कामे वेळेवर पूर्ण झाली. त्यामुळे धानपिकाची स्थिती चांगली होती. मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलके धानपीक निसवले आहे. मात्र पीक हातात येण्यासाठी पुन्हा एका पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकºयांकडे तलाव, बोडी आहेत, असे शेतकरी धानपिकाला पाणी देत आहेत.मागील वर्षी धान निसवण्याच्या मार्गावर असताना मावा, तुडतुडा रोगाचा प्रकोप झाला होता. निसवलेले धान करपताना शेतकºयांना बघावे लागत होते. परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे यावर्षी शेतकरी धास्तावला आहे. रोग आटोक्यात यावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके फवारली जात आहेत.जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासाकुरखेडा : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले होते. दरम्यान मोटार पंप, डिझेल इंजिनच्या माध्यमातून पाणी देऊन धान वाचविण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून केला सुरू होता. याच कालावधीत गुरूवारी व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर होऊन धानपीक डोलत होते. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक धोक्यात आले होते. हलके पीक निसवण्याच्या मार्गावर आहे. याही पिकाला पाण्याची आवश्यकता होती. नेमक्या याच वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.पिकांच्या संरक्षणासाठी साडीचे कुंपणखरीप हंगामातील अल्पमुदतीचे धानपीक आता शेवटच्या टप्प्यात आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने भरघोष उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली आहे. मात्र धानपीक लोंबावर असताना रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केला आहे.कधी नव्हे एवढा रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रोवणी झाल्यानंतर धानपीक पालवीला आल्यापासूनच रानडुकरांकडून धानपिकाची नासाडी सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, करपडा, कोजबी, गणेशपूर, सिर्सी आदी गावातील शेतकऱ्यांची रानडुकर हैदोसाबाबत ओरड सुरू आहे. वन्यजिवांकडून होणाºया नुकसानीबद्दल शेतकºयांनी वैरागडचे क्षेत्रसहायक, वनरक्षक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली. मात्र रानडुकर बंदोबस्ताची वन विभागाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. अशा स्थितीत साड्यांपासून कुंपण बनवून अनेक शेतकरी आपल्या धानपिकाचे संरक्षण करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती