शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:02 IST

दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवैरागड परिसरात उद्रेक : शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सुरुवातीला अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धानाची सर्वच कामे वेळेवर पूर्ण झाली. त्यामुळे धानपिकाची स्थिती चांगली होती. मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलके धानपीक निसवले आहे. मात्र पीक हातात येण्यासाठी पुन्हा एका पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकºयांकडे तलाव, बोडी आहेत, असे शेतकरी धानपिकाला पाणी देत आहेत.मागील वर्षी धान निसवण्याच्या मार्गावर असताना मावा, तुडतुडा रोगाचा प्रकोप झाला होता. निसवलेले धान करपताना शेतकºयांना बघावे लागत होते. परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे यावर्षी शेतकरी धास्तावला आहे. रोग आटोक्यात यावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके फवारली जात आहेत.जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासाकुरखेडा : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले होते. दरम्यान मोटार पंप, डिझेल इंजिनच्या माध्यमातून पाणी देऊन धान वाचविण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून केला सुरू होता. याच कालावधीत गुरूवारी व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर होऊन धानपीक डोलत होते. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक धोक्यात आले होते. हलके पीक निसवण्याच्या मार्गावर आहे. याही पिकाला पाण्याची आवश्यकता होती. नेमक्या याच वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.पिकांच्या संरक्षणासाठी साडीचे कुंपणखरीप हंगामातील अल्पमुदतीचे धानपीक आता शेवटच्या टप्प्यात आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने भरघोष उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली आहे. मात्र धानपीक लोंबावर असताना रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केला आहे.कधी नव्हे एवढा रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रोवणी झाल्यानंतर धानपीक पालवीला आल्यापासूनच रानडुकरांकडून धानपिकाची नासाडी सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, करपडा, कोजबी, गणेशपूर, सिर्सी आदी गावातील शेतकऱ्यांची रानडुकर हैदोसाबाबत ओरड सुरू आहे. वन्यजिवांकडून होणाºया नुकसानीबद्दल शेतकºयांनी वैरागडचे क्षेत्रसहायक, वनरक्षक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली. मात्र रानडुकर बंदोबस्ताची वन विभागाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. अशा स्थितीत साड्यांपासून कुंपण बनवून अनेक शेतकरी आपल्या धानपिकाचे संरक्षण करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती