शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:02 IST

दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवैरागड परिसरात उद्रेक : शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सुरुवातीला अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धानाची सर्वच कामे वेळेवर पूर्ण झाली. त्यामुळे धानपिकाची स्थिती चांगली होती. मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलके धानपीक निसवले आहे. मात्र पीक हातात येण्यासाठी पुन्हा एका पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकºयांकडे तलाव, बोडी आहेत, असे शेतकरी धानपिकाला पाणी देत आहेत.मागील वर्षी धान निसवण्याच्या मार्गावर असताना मावा, तुडतुडा रोगाचा प्रकोप झाला होता. निसवलेले धान करपताना शेतकºयांना बघावे लागत होते. परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे यावर्षी शेतकरी धास्तावला आहे. रोग आटोक्यात यावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके फवारली जात आहेत.जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासाकुरखेडा : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले होते. दरम्यान मोटार पंप, डिझेल इंजिनच्या माध्यमातून पाणी देऊन धान वाचविण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून केला सुरू होता. याच कालावधीत गुरूवारी व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर होऊन धानपीक डोलत होते. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक धोक्यात आले होते. हलके पीक निसवण्याच्या मार्गावर आहे. याही पिकाला पाण्याची आवश्यकता होती. नेमक्या याच वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.पिकांच्या संरक्षणासाठी साडीचे कुंपणखरीप हंगामातील अल्पमुदतीचे धानपीक आता शेवटच्या टप्प्यात आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने भरघोष उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली आहे. मात्र धानपीक लोंबावर असताना रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केला आहे.कधी नव्हे एवढा रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रोवणी झाल्यानंतर धानपीक पालवीला आल्यापासूनच रानडुकरांकडून धानपिकाची नासाडी सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, करपडा, कोजबी, गणेशपूर, सिर्सी आदी गावातील शेतकऱ्यांची रानडुकर हैदोसाबाबत ओरड सुरू आहे. वन्यजिवांकडून होणाºया नुकसानीबद्दल शेतकºयांनी वैरागडचे क्षेत्रसहायक, वनरक्षक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली. मात्र रानडुकर बंदोबस्ताची वन विभागाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. अशा स्थितीत साड्यांपासून कुंपण बनवून अनेक शेतकरी आपल्या धानपिकाचे संरक्षण करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती