शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

तालुक्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:37 IST

अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गाव परिसरात ३० हजारावर लोकसंख्या आहे. सदर भाग अतिशय अविकसित आहे. या भागाच्या विकासासाठी कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालकंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकमलापुरातील नागरिकांची मागणी : अनेक समस्यांमुळे विकास दूर

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गाव परिसरात ३० हजारावर लोकसंख्या आहे. सदर भाग अतिशय अविकसित आहे. या भागाच्या विकासासाठी कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पालकंत्र्यांना निवेदन देण्यात आले.कमलापूर परिसरात मूलभूत समस्यांची भरमार आहे. या भागात अनेक मूलभूत समस्यांचा अभाव आहे. या भागात अनेक गावे येत असतानाही उच्च शिक्षणाची सोय नाही. अहेरी अथवा गडचिरोली येथे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. दुर्गम भागात रस्ते वीज बससेवा उपलब्ध नाही. वंदनीय तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेली भारतातील पहिली आश्रम शाळा येथे आहे.कमलापूरला तालुक्याचा दर्जा मिळाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी भामरागड तालुका निर्मितीनंतर कमलापूरला तालुक्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतू त्यानंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले असताना कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात आला नाही. गडचिरोली जिल्ह्यातील नवीन तालुक्याच्या निर्मितीकडे शासनाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. या भागातील नागरिकांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन कमलापूरला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.पालकमंत्री आत्राम यांनी लवकरच अहेरी जिल्हा निर्माण करून कमलापूर तालुका निर्माण केला जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना सरपंच रजनीता मडावी, सांबय्या रालाबंडीवार, गोकुल भट, पवन ताटीकोंडावार, राजन्ना दैदावार, रमनय्या ओलेटीवार, सत्यनारायण रेपालवार उपस्थित होते.