शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड मार्गावरील चार ठेंगणे पूल अडवितात वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST

भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर चार ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. पावसाळ्यात सदर रपट्यांवरून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे अनेकदा हा ...

भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर चार ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. पावसाळ्यात सदर रपट्यांवरून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे अनेकदा हा मार्ग रहदारीसाठी बंद असताे. मार्गावरील रपट्यांच्या जागी उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांमध्ये राेष आहे.

दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी भामरागड-आलापल्ली हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर चंद्र नाला, ताडगाव नाला, तसेच कुडकेली व कुमरगुडा गावाजवळ नाला आहे. या नाल्यांवर ठेंगणे पूल व रपटे आहेत. पावसाळ्यात पुलांवरून पुराचे पाणी वाहत असते. दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे; मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने याही वर्षी पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

भामरागड-आलापल्ली मार्गावर जागाेजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. आलापल्लीपर्यंतचे ६५ कि.मी. अंतर गाठण्यासाठी अडीच ते तीन तास प्रवास करावा लागताे. परंतु, सध्या रस्ता बांधकाम सुरू असल्याने ही समस्या सुटणार आहे. तसेच पेरमिली गावाजवळचा मोठा नाला व बांडिया नदीसह पर्लकोटा या मोठ्या नदीवरही उंच पूल बांधण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी चार-पाच दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटताे. परंतु, या पुलांचे बांधकाम झाल्यास संपर्क तुटणार नाही. बारमाही वाहतूक सुरू राहील. चंद्रनाला, कुडकेली नाला, ताडगाव व कुमरगुडा नाल्यांवर उंच पूल बांधकाम करण्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाही. पावसाळ्यात चंद्रनाला पार केला तरी कुडकेली नाला अडवितो. त्यानंतर पेरमिलीपर्यंतही परत जाता येत नाही. तसेच एक वेळ चंद्रनाला व कुडकेली नाला पार केला तर कधी ताडगाव नाला अडवितो किंवा ताडगाव नाला पार केला तर कुमरगुडा नाला वाट अडविताे. पावसाळ्यात थाेडाही पाऊस आल्यास ठेंगणे पूल व रपट्यांवरून पाणी वाहते. पावसाळ्यात ही स्थिती अनेकदा निर्माण हाेते. पायदळ, सायकल व मोटारसायकलस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. खासगी वाहनधारक व रात्री मुक्कामाच्या बसेस पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करतात. त्यामुळे चारही नाल्यांवर उंच पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.