शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार बालकांचे पहिलीत पाऊल

By admin | Updated: June 26, 2016 01:08 IST

२७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत.

स्वागताची तयारी सुरू : ४ हजार ८७० विद्यार्थिनी; गळती थांबविण्याचे निर्देशगडचिरोली : २७ जून पासून शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाभरातील ९ हजार ८२० विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. लहान बालक बोलायला लागल्यानंतर जवळपास वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला अंगणवाडीत दाखल केले जाते. अंगणवाडीत त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच शिक्षणाचे थोडेफार धडेही दिले जातात. मात्र प्रत्यक्षात शिक्षण पहिल्या वर्गापासूनच सुरूवात होते. शाळेमध्ये पहिल्यांदाच बालक जात असल्याने पालक वर्गामध्ये उत्सुकता राहते. प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर बैठका घेऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या गोळा केली आहे. यामध्ये चालू सत्रासाठी सुमारे ९ हजार ८२० विद्यार्थी दाखल होणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे ८६३ विद्यार्थी, अनुसूचित जमातीचे ४ हजार ४६६ विद्यार्थी, विमुक्त भटक्या जमातीचे १ हजार ४३, इतर मागास वर्गातील २ हजार ६९४, अल्पसंख्यांक समाजाचे ५२ विद्यार्थी व बिगर मागास प्रवर्गाचे ५०२ विद्यार्थी आहेत. दाखलपात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी मुलांची संख्या ४ हजार ९५० तर मुलींची संख्या ४ हजार ८७० एवढी आहे. उन्हाळाभर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेमध्ये दाखल केले आहे. शाळेमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गळती होणार नाही, याचीही खबरदारी शिक्षकांना घ्यावी लागणार आहे. गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (नगर प्रतिनिधी)८७५ शाळाबाह्य विद्यार्थी आढळलेशिक्षण विभागाच्या वतीने उन्हाळ्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ८७५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. यामध्ये ४३२ मुले व ४४३ मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना त्या-त्या वर्गात दाखल केले जाणार आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५२, आरमोरी ७, धानोरा ९४, चामोर्शी १२, अहेरी ६१, एटापल्ली १६७, सिरोंचा ११६, मुलचेरा ५, कोरची ३७, भामरागड २५६, देसाईगंज १६, कुरखेडा तालुक्यात ५२ विद्यार्थी आढळून आले. अधिकारी, पदाधिकारी करणार नवागतांचे स्वागतशाळेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून केले जाणार आहे. कोणत्या पदाधिकाऱ्याने कोणत्या शाळेमध्ये जावे, याचे नियोजन शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर सभा घेऊन केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी गावातून रॅलीसुध्दा काढण्याचे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.बेजूर शाळेतील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवादविद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम मुख्यमंत्री सुध्दा करणार आहेत. भामरागड तालुक्यातील बेजूर शाळेत एक ते पाच वर्ग आहेत. यामध्ये एकूण २९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तीन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. सदर विद्यार्थी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सेंटरमधून मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत.