शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आवलमरीतील पाण्याचे कुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:07 IST

आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़

आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़ हे कुंड तालुक्यात पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. आवलमरी गावातील हे पाण्याचे कुंड तालुक्यासह गडचिरोली जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यातील आदिवासींकरिता श्रद्धा, तर वैज्ञानिकांसाठी संशोधनाचे केंद्र बनले आहे. दरवर्षी आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्रित येतात आणि आपल्या आदिम देवीदेवतांचे येथे पूजन करतात. या कुंडाबाबत अनेक आख्यायिकादेखील प्रसिद्ध आहेत. या आश्चर्यकारक कुंडाजवळ टाळी वाजविल्यास कुंडातील पाणी उकळल्यासारखे हलायला लागते. टाळीचा आवाज जितका जास्त असेल तितकी कुंडातील हालचाल देखील जलद गतीने होते. विशेष म्हणजे ही सर्व हालचाल केवळ पाण्याच्या आतील भागातच सुरू असते. वरील स्तरावर मात्र पाणी संथ दिसते. टाळी वाजविताच जणू गरम पाण्याला उकळी यावी तसे पाण्यात तरंग निर्माण होतात़ आदिवासी या कुंडातील पाणी उकळते असे सांगत असले तरी कुंडातील पाण्यात केवळ उकळी आल्यासारखा भास होतो. मात्र पाणी प्रत्यक्षात उकळत नाही. दरवर्षी या ठिकाणी आदिवासी मोठ्यासंख्येने एकत्र येतात तेव्हा या परिसरात जुन्या परंपरेनुसार कोंबडे, बोकडांचे बळी दिले जातात. मात्र आदिवासी नागरिक या कुंडात उतरण्याची आणि पाण्यास स्पर्श करण्याची परवानगी देत नाहीत. एवढे मात्र खरे की, पर्यटकांना निसर्गाची एक निराळीच किमया या ठिकाणी निश्चितच अनुभवण्यास मिळते. या ठिकाणी सुरुवातीला सहा ते सात कुंड होते. त्यावेळी त्यांचे आकार देखील मोठे होते. कालांतराने काही कुंड नाहीशे झाले. आता केवळ तीन -चार कुंड शिल्लक आहेत, असे या परिसरातील जुन्या पिढीतील नागरिक सांगतात. निसर्गाच्या या चमत्काराची कारणे वैज्ञानिक शोधत आहेत. मात्र हा तालुक्यातील दुर्गम भाग असल्याने त्यात अडचणी येत आहेत. येत्या काळात या कुंडाचे रहस्य नक्कीच उलगडेल अशी अपेक्षा आहे. हा भागात दुर्गम असल्याने येथे पर्यटकही कमी येतात़ घनदाट रानाची हिरवळ अनुभवत निसर्गाचा हा चमत्कार बघून पर्यटक आपसूकच नतमस्तक होतो़ आदिवासीबांधवांचे हे श्रद्धास्थळ पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ होणे आवश्यक आहे़वैेज्ञानिक दृष्टीने आवलमरीचा कुंड संशोधनाचा विषय असला तरी आदिवासी बांधवांच्या श्रद्धेचे स्थान आहे. दोन्ही बाबींचा विचार करून या स्थळाचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल.

टॅग्स :Waterपाणी