शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

आवलमरीतील पाण्याचे कुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:07 IST

आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़

आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़ हे कुंड तालुक्यात पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. आवलमरी गावातील हे पाण्याचे कुंड तालुक्यासह गडचिरोली जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यातील आदिवासींकरिता श्रद्धा, तर वैज्ञानिकांसाठी संशोधनाचे केंद्र बनले आहे. दरवर्षी आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्रित येतात आणि आपल्या आदिम देवीदेवतांचे येथे पूजन करतात. या कुंडाबाबत अनेक आख्यायिकादेखील प्रसिद्ध आहेत. या आश्चर्यकारक कुंडाजवळ टाळी वाजविल्यास कुंडातील पाणी उकळल्यासारखे हलायला लागते. टाळीचा आवाज जितका जास्त असेल तितकी कुंडातील हालचाल देखील जलद गतीने होते. विशेष म्हणजे ही सर्व हालचाल केवळ पाण्याच्या आतील भागातच सुरू असते. वरील स्तरावर मात्र पाणी संथ दिसते. टाळी वाजविताच जणू गरम पाण्याला उकळी यावी तसे पाण्यात तरंग निर्माण होतात़ आदिवासी या कुंडातील पाणी उकळते असे सांगत असले तरी कुंडातील पाण्यात केवळ उकळी आल्यासारखा भास होतो. मात्र पाणी प्रत्यक्षात उकळत नाही. दरवर्षी या ठिकाणी आदिवासी मोठ्यासंख्येने एकत्र येतात तेव्हा या परिसरात जुन्या परंपरेनुसार कोंबडे, बोकडांचे बळी दिले जातात. मात्र आदिवासी नागरिक या कुंडात उतरण्याची आणि पाण्यास स्पर्श करण्याची परवानगी देत नाहीत. एवढे मात्र खरे की, पर्यटकांना निसर्गाची एक निराळीच किमया या ठिकाणी निश्चितच अनुभवण्यास मिळते. या ठिकाणी सुरुवातीला सहा ते सात कुंड होते. त्यावेळी त्यांचे आकार देखील मोठे होते. कालांतराने काही कुंड नाहीशे झाले. आता केवळ तीन -चार कुंड शिल्लक आहेत, असे या परिसरातील जुन्या पिढीतील नागरिक सांगतात. निसर्गाच्या या चमत्काराची कारणे वैज्ञानिक शोधत आहेत. मात्र हा तालुक्यातील दुर्गम भाग असल्याने त्यात अडचणी येत आहेत. येत्या काळात या कुंडाचे रहस्य नक्कीच उलगडेल अशी अपेक्षा आहे. हा भागात दुर्गम असल्याने येथे पर्यटकही कमी येतात़ घनदाट रानाची हिरवळ अनुभवत निसर्गाचा हा चमत्कार बघून पर्यटक आपसूकच नतमस्तक होतो़ आदिवासीबांधवांचे हे श्रद्धास्थळ पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ होणे आवश्यक आहे़वैेज्ञानिक दृष्टीने आवलमरीचा कुंड संशोधनाचा विषय असला तरी आदिवासी बांधवांच्या श्रद्धेचे स्थान आहे. दोन्ही बाबींचा विचार करून या स्थळाचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल.

टॅग्स :Waterपाणी