शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

आठवडा संपूनही 40 हजार विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती.  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाेराेनाची भीती कायमच : अपेक्षेपेक्षा विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती कमी

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाच्या आदेशानुसार २३ नाेव्हेंबरपासून जिल्हाभरातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ४६ हजार ५५० विद्यार्थ्यांपैकी केवळ ६ हजार ९२६ विद्यार्थी उपस्थित आहेत.  उपस्थितीचे प्रमाण १४.८७ टक्के आहे. अजुनही ३९ हजार ६२४ विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.  काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती.  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्याच्या अनेक मर्यादा आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. पुढील चार महिन्यात परीक्षेचा कालावधी येणार आहे. अशास्थितीत शाळा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे आणखी माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या दिवशी केवळ पाच टक्के विद्यार्थी उपस्थित हाेते. हळुहळू विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल, असा अंदाज हाेता. मात्र दुसरा आठवडा आता संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही केवळ १५ टक्के विद्यार्थी हजर आहेत. यातही बहुतांश विद्यार्थी केवळ दहावी व बारावीचे आहेत. नववी व अकरावीचे अनेक विद्यार्थी येत नसल्याची स्थिती आहे.  विद्यार्थी उपस्थितीसाठी पालकाची सहमती आवश्यक केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सहमतीपत्र भरवून घेतले जात आहे. मात्र अनेक पालकांनी अजुनही सहमतीपत्र दिले नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी उपस्थिती दिसून येत आहे. मात्र तालुका व जिल्हास्तरावरील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय कमी आहे. काेराेनाचे संकट अजुनही कायम आहे. त्यामुळे बरेचशे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाही. दिवाळीनंतर काेराेना रूग्णांची संख्या वाढली हाेती. मागील पाच ते सहा दिवसांपासून मात्र रूग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन करून त्यांचे मन वळविण्याची गरज आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी