शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

जंगल भागात कृषी पंपासाठी विजेची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST

देसाईगंज तालुक्यातील अर्धा-अधिक भाग हा ईटीयाडोह या धरणाच्या पाण्याने सिंचित होत आहे.पलीकडील भागात मात्र गाढवी नदीमुळे तो भाग सिंचन ...

देसाईगंज तालुक्यातील अर्धा-अधिक भाग हा ईटीयाडोह या धरणाच्या पाण्याने सिंचित होत आहे.पलीकडील भागात मात्र गाढवी नदीमुळे तो भाग सिंचन होत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विहीर वा कूपनलिका खोदून सिंचनाची सुविधा केलेली आहे. तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली आहे. त्यातच हे शेतकरी आपले पीक घेत आहेत. विहीरगाव, चिखली रिठ, डोंगरगाव हलबी, शिरपूर, भगवानपूर देऊळगाव , पिंपळगाव हलबी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वनविभागाची जागा ताब्यात घेऊन व तेथील वने संपुष्टात आणून त्या ठिकाणी शेती उठविली आहे. त्यापैकी काहीच शेतकऱ्यांना शासनाने वनजमिनीचे पट्टे देऊन नियमित केले आहेत. तर काहींनी लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट करीत त्या ठिकाणी जागा उठीत करुन त्या ठिकाणी शेतजमिनी काढून स्वखर्चाने विहीर वा कूपनलिका तयार केली आहे. या परिसरात ज्यांना वनपट्टे मिळाले आहेत त्या लाभार्थ्यांना वीज कनेक्शन देण्यात आले आहेत. त्या ठिकाणावरून गेलेल्या वीज तारांवर अतिक्रमणधारक शेतकरी हुक टाकून विजेची चोरी करीत आहेत. हा शेती परिसर जंगलव्याप्त भाग असल्याने या ठिकाणी महावितरणचे अधिकारी वा कर्मचारी ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे चांगले फावत असून यामुळे महावितरणला लाखोंचा चुना लावत आहे. याउलट जे शेतकरी महावितरणचे नियमाकुल ग्राहक आहेत त्यांनाच मात्र वीज बिल भरण्याबाबत नेहमीच तंबी दिली जात आहे.