शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळातही जिल्हाभरात कौटुंबिक हिंसाचार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST

बहुतांश प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणातून निर्माण झालेले वाद हे या कौटुंबिक हिंसाचारामागील मुख्य कारण आहे. पतीकडून एखाद्या ...

बहुतांश प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणातून निर्माण झालेले वाद हे या कौटुंबिक हिंसाचारामागील मुख्य कारण आहे. पतीकडून एखाद्या कारणावरून वारंवार भांडण करणे किंवा दारू पिऊन मारहाण करणे असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहेत; पण महिला अनेक दिवस हा अत्याचार सहन करत असल्याचेही या प्रकरणांत दिसून आले. पतीच्या वागण्यात फरक पडतच नाही आणि त्याचे वागणे असह्य झाल्यानंतरच महिला तक्रार करण्यासाठी पुढे सरसावते. पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेची पती किंवा सासू-सासऱ्यांविरूद्धची तक्रार घेतली जात असली तरी थेट गुन्हा दाखल न करता सामोपचाराने त्यांच्यातील वाद, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या समुपदेशन केंद्रामार्फत केला जातो. जिल्ह्यात गडचिरोलीसह देसाईगंज, चामोर्शी आणि अहेरी अशा चार ठिकाणी ही समुपदेशन केंद्र आहेत. त्या ठिकाणी प्रकरण मिटत नसल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा पातळी समुपदेशन केंद्रात हे प्रकरण पाठविले जाते. त्या ठिकाणीही समेट न झाल्यास त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला देऊन जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांमार्फत संबंधित महिलेला कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. काही प्रकरणे थेट महिला-बाल कल्याण अधिकाऱ्यांकडे येतात.

संशयी वृत्तीतून वाढत आहेत हिंसा

गडचिरोली जिल्ह्यात पती-पत्नीमध्ये नसलेली विश्वासाची भावना हे त्यांच्यातील वादाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. पत्नी बाहेरच्या एखाद्या व्यक्तीशी बोलली, त्याच्याकडे पाहून हसली किंवा मोबाइलवर एखाद्या व्यक्तीशी संवाद झाला तर पतीकडून संशय घेतला जातो. त्यात पतीला दारूचे व्यसन असेल तर पत्नीला मारहाण केली जाते. संशयाचे हे भूत त्यांच्या मनातून उतरत नाही म्हणून अखेर पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण पोहोचते, असे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी नारायण परांडे यांनी सांगितले.

१० प्रकरणांत घडविला समेट

समुपदेशन केंद्रात गेल्या १४ महिन्यांत दाखल प्रकरणापैकी १० प्रकरणांत समेट घडवून आणण्यात संबंधितांना यश आले. पती-पत्नी किंवा कुटुंबीयांमध्ये नेमक्या कोणत्या कारणातून वाद होतो, त्यातून कोणी कुठे सुधारणा करण्याची गरज आहे. गैरसमज कसे दूर करावेत, कौटुंबिक विश्वास आणि प्रेमाची गरज का आहे, अशा विविध पद्धतीने समजावून सांगून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो; पण अनेकवेळा ज्याच्याकडून अत्याचार होतात ती व्यक्ती तारखेवर हजरच होत नाही.