शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

अधिकार क्षेत्राबाहेरील दाखले मागू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 5:00 AM

ग्रामपंचायतीला अस्तित्वात असलेल्या दस्तावेजांची सत्यप्रत म्हणून ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव या नात्याने दाखले पारित करतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५ अनुसार ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५ /आस्था-५ दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ अन्वये केवळ ७ लोकसेवा विहित कालमर्यादेत देण्याचे निश्चित केलेले आहे. इतर स्वयंघोषणा पत्राआधारे पूर्तता करावयाचे आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : शासनाच्या विविध योजना राबविताना महसूल विभागाकडून ग्रामपंचायत सचिवाला विविध प्रमाणपत्रांची मागणी केली जाते. मात्र काही दाखले ग्रामसेवकाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील आहेत. अशा दाखल्यांची मागणी ग्रामसेवकाकडे करू नये, अशी मागणी ग्रामसेवकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ग्रामपंचायतीला अस्तित्वात असलेल्या दस्तावेजांची सत्यप्रत म्हणून ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव या नात्याने दाखले पारित करतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश - २०१५ अनुसार ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक आरटीएस-२०१८/प्र.क्र.१४५ /आस्था-५ दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ अन्वये केवळ ७ लोकसेवा विहित कालमर्यादेत देण्याचे निश्चित केलेले आहे. इतर स्वयंघोषणा पत्राआधारे पूर्तता करावयाचे आहे. असे असतानाही शासनाच्या योजनेकरिता दिलेल्या अर्जात ग्रामपंचायत सचिवांचे रहिवासी, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, कौटुंबिक विवरणपत्राची मागणी केली जाते. जी सचिवाकडे उपलब्ध नसते.सदर अधिकार क्षेत्रा बाहेरील दाखले न दिल्यास ग्रामस्थांशी वाद उफाळून येतो. ग्रामसेवकावर  दबावतंत्राचा वापर केला जात असल्याने त्यांची मानसिकता ढासळलेली आहे. त्यामुळे हे दाखले ग्रामपंचायत सरपंच/सदस्य/पोलीस पाटील या सक्षम व्यक्तींकडून स्वीकारण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. या विविध मुद्द्यांवर तालुका संघटनेनी चामोर्शी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.तहसीलदार यांनी विषय समजून घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ग्रामविकास मंत्रालय, महसूल व समाजकल्याण विभागाचे शासन निर्णय विरोधाभास दर्शवित असल्याने या संघर्षास ग्रामसेवक संवर्ग बळी पळतोय, असे युनियनचे तालुका अध्यक्ष यादव मुळे यांनी प्रतिपादन केले. यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेचे कोषाध्यक्ष धनंजय शेंडे, दिलीप शेंडे, ग्रामविकास अधिकारी मधुकर कुकडे, श्रीकृष्ण मंगर, मंगेशकुमार वाळके, विशाल चिडे आदी   पदाधिकारी उपस्थित होते.

गावात वाद वाढलेजे दाखले देण्याचे ग्रामसेवकांना अधिकार नाही, अशा दाखल्यांची नागरिक मागणी करतात. दाखला न दिल्यास ग्रामसेवक जाणून-बूजून दाखला देत नाही, असा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण हाेते. यातून नागरिक व ग्रामसेवक यांच्यामध्ये वाद-विवाद हाेतात. या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामसेवकांनी केली आहे. 

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारgram panchayatग्राम पंचायत