शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
3
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
4
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
5
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
6
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
7
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
8
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
9
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
10
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
11
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
12
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
13
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
14
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
15
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
16
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
17
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
18
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
19
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाची झळ सोसलेला जिल्हा

By admin | Updated: May 21, 2015 01:49 IST

भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.

गडचिरोली : भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. देशात गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागाला दहशतवादाने व्यापलेले आहे. आता ही समस्या आंतरराष्ट्रीय झाली असली, तरी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाने ग्रासले आहे. नक्षली दहशतवादामुळे या जिल्ह्याच्या विकासावर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंब या दहशतवादाने पीडित झाले आहेत. यावर तोडगा निघावा याकरिता आता सरकारने कायम उपाययोजन करायला हवी, अशी भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी दिवसाच्या निमित्ताने सर्वांनी नक्षलमुक्त व दहशतमुक्त गाव, जिल्हा, देश अशी प्रतिज्ञा करायला हवी.
स्वातंत्र्यानंतर देशात अनेक दहशतवादी हल्ले झालेत. या हल्ल्यात देशातील दोन पंतप्रधानही मारले गेले. दहशतवाद, नक्षलवाद यांचा मुकाबला करतांना अनेक जवानांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. देशातील दहशतवाद कायम निपटून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र अजूनही काही आंतरबाह्य शक्ती या देशाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी हल्ले करून आपला अस्तीत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही वर्षात देशातील सात ते आठ राज्यांमध्ये नक्षलवादाची नवी समस्या निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार हा ही दहशतवादाचाच एक भाग आहे. गडचिरोली जिल्हा हा या दहशतवादाने प्रचंड होरपळून निघाला आहे.
१९८० च्या दशकात या जिल्ह्यात नक्षली कारवायांना सुरूवात झाली. आंध्रप्रदेश मार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या अरण्य प्रदेशात नक्षलवाद्यांचे पाळेमुळे रोवले जाऊ लागले. गेल्या ३० - ४० वर्षात जिल्ह्यातील नक्षली दहशतवादाने उग्ररूप धारण केले आहे. आतापर्यंत १५० वर अधिक पोलीस जवान या नक्षली हल्ल्यात शहीद झाले. तर ४५२ वर अधिक नागरिक नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात बळी पडले. अनेक कुटुंबांना या हिंसाचाराच्या झळा पोहोचल्या.
कुणाचा बाप, भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची मुलगी, आई, पत्नी या हिंसाचारात मारल्या गेले. मात्र या सर्व हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल सक्षमतेने काम करीत आहे. हा जिल्हा नक्षली दहशतवादातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा २१ मे रोजी सर्व जिल्हावासीयांनी करण्याची गरज आहे. अनेक गावांनी नक्षलवाद्यांना गाव बंदी करून याची सुरूवात केली आहे. हिंसाचार हा कुठल्याही स्वरूपाचा असो त्याचा विरोध प्रखरपणे झाला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने दहशतवाद विरोधी दिन साजरा करण्यामागचा उद्देश यशस्वी होईल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. (जिल्हा प्रतिनिधी)