शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये जलसंधारणाबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 01:35 IST

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाभरात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोली : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाभरात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पहिल्यांदाच १ मेच्या ग्रामसभेत जलसंधारणाबाबत व्यापक चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाने यावर्षीपासून संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केला आहे. जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिन याचे औचित्य साधून प्रत्येक ग्राम पंचायतीने १ मे रोजी ग्रामसभा घेण्याचे निर्देश आहेत. यावर्षी १ मेच्या ग्रामसभांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती देण्यात आली. या योजनेत गावकऱ्यांचा सहभाग कशापद्धतीने वाढविता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. थेंबथेंब पाण्याची बचत करून गावपातळीवर पाण्याचा प्रश्न सोडविण्यास लोकसहभागाचा हातभार कसा महत्त्वाचा आहे, हे सांगण्यात आले. ग्रामसभेत पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना, वृक्षसंवर्धन, सहा वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालकांमधील मुला, मुलींचे प्रमाण, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवानाने होणारे घातक परिणाम आदी बाबतही माहिती देण्यात आली. या ग्रामसभेमुळे जलसंधारणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास फारमोठी मदत झाली आहे.
१ मेची ग्रामसभा विशेष ग्रामसभा मानल्या जाते. या कालावधीत शेतीची कामे संपलेली असल्याने सर्वाधिक हजेरी या ग्रामसभेला दिसून आली. नागरिकांमध्येही प्रचंड प्रमाणात उत्साह दिसून आला. काही गावच्या ग्रामसभा मात्र कोरमअभावी तहकूब कराव्या लागल्या. (नगर प्रतिनिधी)