शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज व कोरचीत वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: January 9, 2017 00:51 IST

रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे.

अपघात वाढले : अतिक्रमणामुळे निर्माण झाली समस्या, कोरचीवासीयांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनदेसाईगंज/कोरची : रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. कोरची येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरची हे १३३ गावांचे संपर्क ठिकाण असल्याने या ठिकाणी वाहने व नागरिकांचे नेहमीच वर्दळ राहते. आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य मार्गावरून वाहन घेऊन जाणे कठीण होते. कोरची ग्रामपंचायत असताना नगरातील प्रमुख रस्ते रूंदीकरणाकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांनी मिळून अतिक्रमणधारकांना रस्त्याच्या मुख्य केंद्रापासून १२ मीटरपर्यंतचे अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दिले होते. मात्र संधीसाधू लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. १० वर्षा अगोदर अतिक्रमण हटविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. मात्र त्याचेही काहीच झाले नाही. कोरची येथील रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. कोरची येथे ब्रह्मपुरी, गडचिरोली, साकोली व गोंदिया आगाराच्या बसेस येतात. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावे, अशी मागणी कोरची शहरातील नागरिकांकडून करण्यात येत असली तरी याकडे नगर पंचायत तसेच बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. विविध वस्तू खरेदीसाठी जिल्हाभरातील नागरिक देसाईगंज येथे येतात. त्यामुळे बाजारपेठ, मुख्य मार्गावर चारचाकी वाहने व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र देसाईगंजातही अतिक्रमणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातून मुख्य मार्गाने रस्ता दुभाजक नाही. त्यामुळेही वाहनांवर नियंत्रण राहत नाही. कधीकधी चार ते पाच वाहने एकाच वेळेवर आल्याने वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानकासमोर वर्षभर गर्दी राहते. स्वतंत्र बसस्थानक नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या समोरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.कोरचीत इतरही समस्या कायमग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले असले तरी शहराच्या विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. शहराच्या विकासासाठी आठवडी बाजाराचे स्थानांतरण करावे, कचऱ्याचा स्वतंत्र डम्पिंग ग्राऊंड तयार करावा, सर्वच वार्डांमध्ये सीमेंट रस्ते, नाली बांधकाम व मोरी बांधकाम करावे, क्रीडा संकुलाचे बांधकाम करून नवीन बगिचा बांधण्यात यावा, तलावाची दुरूस्ती करून सौंदर्यीकरण करावे, कोरची येथील गरजू व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कोरची येथील हिरालाल पांडुरंग राऊत, परदेशी बगवा, प्रियतमा खुशाल जेंगठे यांनी केले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.