शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

दिभन्याच्या विठ्ठलभक्तांची २२ वर्षांची वारी

By admin | Updated: October 26, 2016 02:03 IST

‘भेटी लागे जीवा, लागलीसे आस’ असे आळवीत विठ्ठल भक्तीत रममान झालेले भाविक कार्तिक पौर्णिमेची वाट पाहत असतात.

१ नोव्हेंबरला गावातून प्रस्थान : लालाजी जेंगठे, विनूदास गुरनुले सायकलने गाठणार ७६८ किमीचे अंतरगडचिरोली : ‘भेटी लागे जीवा, लागलीसे आस’ असे आळवीत विठ्ठल भक्तीत रममान झालेले भाविक कार्तिक पौर्णिमेची वाट पाहत असतात. विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात. विठ्ठलभक्तीत दंग झालेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागली असते. असेच काहीसे भाविक गडचिरोली तालुक्यातील दिभना गावात आहेत. मागील २२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत मग्न होऊन कार्तिकीची वारी न चुकता ते पूर्ण करीत आहेत. विशेष म्हणजे, वारी रेल्वे अथवा बसगाड्यांनी नव्हे तर सायकलने पूर्ण करून आपल्या अथांग विठ्ठलभक्तीचा परिचय पांडुरंगाच्या चरणी देत आहेत. दिभना या छोट्याशा गावात गेल्या २२ वर्षांपासून पंढरपूर वारीला भाविक जात आहेत. विशेष म्हणजे, येथील ५५ वर्षीय लालाजी जेंगठे व ४० वर्षीय विनूदास सखाराम गुरनुले यांनी २२ वर्षांत एकदाही कार्तिकी एकादशीची वारी चुकवली नाही. नित्यनेमाने ते पंढरपूर वारी करीत आहेत. यंदा कार्तिकी पौर्णिमा १४ नोव्हेंबरला असल्याने लालाजी जेंगठे व विनूदास गुरनुले १ नोव्हेंबरला दिभनातून सायकलने रवाना होणार आहेत. सलग सात दिवस पंढरपूरपर्यंत मार्गक्रमण करून ७६८ किमीचा पल्ला ते गाठणार आहेत. या प्रवासात लागणारे कपडे, अन्य साहित्यसुद्धा ते घेऊन जाणार असून याची तयारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. विठ्ठलभक्ती दृढ असली तर मोठे संकटही सहज पार करता येतात. वारीसाठी मार्गक्रमण करताना विठ्ठलाच्या कृपेने सर्वकाही ठिक होते, अशी धारणा लालाजी जेंगठे व विनूदास गुरनुले यांची आहे.असा राहणार प्रवासदिभना गावातून १ नोव्हेंबरला प्रस्थान केल्यानंतर चंद्रपूर-घुग्घुस-वणी-पांढरकवडा-पारवा-माहूर-पुसद-कळमनूर-हिंगोली-औंढा-नागनाथ-परभनी-गंगाखेड-करडी-आंबेजोगाई-कळम-येरमाडा-माढा-पंढरपूर या मार्गे लालाजी जेंगठे व विनूदास गुरनुले सायकलने प्रवास करणार आहेत. त्यामुळे सोबत संपूर्ण सामग्रीही ते नेणार आहेत. मागील २२ वर्षांपासून नित्यनेमाने ते वारी करीत असल्याने गाव परिसरातही विठ्ठलभक्त म्हणून परिचित आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात वाजतगाजत भजनाद्वारे त्यांना वारीसाठी ग्रामस्थांमार्फत गावाच्या वेशीपर्यंत पोहोचवणी केली जाते.