शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडवासीयांची संघर्ष यात्रा

By admin | Updated: April 29, 2015 01:35 IST

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात....

भामरागड : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात आवाज बुलंद करीत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ २५ एप्रिल पासून संघर्ष यात्रा काढली.
भामरागड तालुक्यातील हजारोच्या आदिवासी नागरिकांनी आपले अधिकार व हक्क मिळविण्यासाठी अतिदुर्गम भागातून संघर्ष यात्रा काढली आहे.
विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी नागरिकांनी २५ एप्रिलपासून संघर्ष यात्रा काढली आहे. सदर संघर्ष यात्रा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी भामरागड तालुका मुख्यालयी पोहोचणार असून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही नागरिकांनी म्हटले आहे. या संघर्ष यात्रेला भामरागड तहसील विकास कृती समिती, तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कमिटी, वनाधिकार समिती व ग्राम शिक्षण समितीने पाठिंबा दर्शविला आहे.
मोर्चेकरी आदिवासींच्या मागण्या
गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, बांबूतोड व विक्री ग्रामसभेच्या माध्यमातून व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी, केंद्र सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी विरोधी असल्याने सदर कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, गोहत्या कायदा रद्द करण्यात यावा, भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासाठी नवी इमारत उभारण्यात यावी, तसेच या प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात यावे, आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा.