शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST

एटापल्ली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाच्या विविध याेजनेतून रस्ता, नाली, समाजभवन, छाेटे-माेठे पूल आदीसह विविध कामे मंजूर करण्यात आली ...

एटापल्ली : तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाच्या विविध याेजनेतून रस्ता, नाली, समाजभवन, छाेटे-माेठे पूल आदीसह विविध कामे मंजूर करण्यात आली असून, ती थंडबस्त्यात आहे. प्रलंबित असलेली कामे यंत्रणेने तत्काळ मार्गी लावावे, असे निर्देश आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात १५ जुलै राेजी गुरूवारला काेराेना व इतर विकासात्मक कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी मंचावर जि. प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशिक, सभापती जनार्धन नल्लावार, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गव्हाणे, माजी सभापती बेबीताई लेकामी, पंचायत समिती सदस्य निर्मला गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुक्यातील कोरोना स्थिती व कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयीची माहिती जाणून घेतले. कोरोना मुक्तीसाठी प्रत्येक गावात लसीकरण होणे अत्यावश्यक असून, यात राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन अधिकारी व कर्मचारी युद्धस्तरावर मोहीम राबवून लसीकरणाची संख्या वाढविण्यासंदर्भात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

तालुक्यातील कामांमध्ये पारदर्शकता ठेवावी, असा सल्ला देत निधीचा दुरुपयाेग झाल्यास आपण मुळीच खपवून घेणार नाही, अशी तंबी ग्रामसेवक व अभियंत्यांना दिली.

यावेळी आरोग्य, शिक्षण, सिंचन, अंगणवाडीतील बालकांचे पोषण आहार, अंगणवाडी इमारती, पेसा निधी कामे, दलितवस्ती सुधार योजना, घरकूल आदींच्या कामांचा आढावा घेतला. व्यवस्थित कामे न करणाऱ्यांना कानपिचक्या व प्रामाणिकपणे काम करीत असणाऱ्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांची त्यांनी काैतुक केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, महिला तालुकाध्यक्ष ललिता मडावी, शहराध्यक्ष पोर्णिमा श्रीरामवार, प्रसाद नामेवार, मिथुन जोशी, विनोद पत्तीवार, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

बाॅक्स....

नावीण्यपूर्ण कामास निधी कमी पडू देणार नाही

कोणत्या हेडखाली कसा निधी येताे, त्या निधीचा उपयाेग कसा करायचा, टेंडर प्रक्रिया कशी राबवायची, काेणत्या पद्धतीने काम केल्यास पारदर्शकता असते, याबाबत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. गावाचा व जनतेचा पैसा कोणाच्या दबावाखाली व मनमर्जीप्रमाणे न वापरता विकास व लोकोपयोगी कामासाठी वापरण्यात यावा, असा सल्ला दिला. तसेच गावाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कामे सुचविल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.