शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आलापल्ली सर्वात मोठी तर वेंगनूर सर्वात लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तर सायगाव ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. देसाईगंज तालुक्यात कुरूड ही सर्वात मोठी तर कसारी तुकूम ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर भाजप-काँग्रेसची सत्ता आहे. यावेळीही परंपरागत लढत होणार की अविरोध निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकुठे पक्षीय लढत तर कुठे स्थानिक गटाचे वर्चस्व

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १५ आणि २० जानेवारीला अशा दोन टप्प्यात होत असलेल्या ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यात ८६४२ मतदार असलेली अहेरी तालुक्यातील आलापल्ली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ठरली आहे. मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर ही अवघे २४२ मतदार असलेली ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात छोटी ग्रामपंचायत आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीत दुसऱ्या टप्प्यात, अर्थात २० जानेवारीला निवडणूक होणार आहे.सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आलापल्ली ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व राहावे यासाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. गेल्यावेळी या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व होते. यावेळीही त्याच पद्धतीने लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा या ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गटांनी कंबर कसल्याचे दिसून येते.आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तर सायगाव ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. देसाईगंज तालुक्यात कुरूड ही सर्वात मोठी तर कसारी तुकूम ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर भाजप-काँग्रेसची सत्ता आहे. यावेळीही परंपरागत लढत होणार की अविरोध निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धानोरा तालुक्यात मुरूमगाव ही सर्वात मोठी तर रेखाटोला ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच आहे. कोरची तालुक्यात बिहीटेकला या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व होते. सर्वात लहान असलेल्या आस्वालहुडकी ग्रामपंचायतवरही काँग्रेसच्या काऱ्यकर्त्यांचेच प्राबल्य आहे. यावेळी ते कायम राहते का याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै ही सर्वात मोठी तर मुधोली रीठ ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा प्रभाव होता. यावेळी भाजप मुसंडी मारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत