शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

चार वर्षात वज्राघाताने ३५ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:46 IST

गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देजनावरांचाही मृत्यू : वीज पडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. ऐन पावसाळ्यात धान रोवणीची कामे केली जातात. धो-धो पाऊस पडत असला तरी रोवणी सुरू होते. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाळ्याच्या दिवसात शेतात राहतात. परिणामी वीज पडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडतात. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. वीज झाडाकडे आकर्षित होते. त्यामुळेही जीवितहानी होते. मेघगर्जना होत असल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये पाहिजे, त्या प्रमाणात जागृती नाही. त्यामुळेही जीव गमवावा लागतो. २०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरातील ३५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मानवाबरोबरच पाळीव प्राण सुध्दा विजांचे शिकार बनतात. मागील चार वर्षात शेकडो जनावरांना जीव गमवावा लागला आहे.विजेपासून संरक्षण करण्यासाठी वीज रोधक यंत्र लावला जातो. मात्र या यंत्राची विजेला अटकाव करण्याची क्षमता फार कमी राहते. वीजरोधक यंत्रापासून ५० ते ६० मीटर अंतरावर वीज पडणार असेल तर तेवढ्या अंतरावरील वीज स्वत:कडे खेचून वीजरोधक यंत्र वीज पडण्यापासून होणारी हानी थांबवू शकते. वीजरोधक यंत्राची ही मर्यादा आहे. विजेपासून संरक्षण करायचे असल्यास मेघगर्जना होत असताना शक्य तो घराबाहेर न पडणे हाच एकमेव उपाय आहे.विजा चमकत असताना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचा खांब, प्रक्षेपण मनोरा यासारख्या उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा. विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणतीही जागा पूर्ण सुरक्षित नसते. तरीही बंदीस्त इमारत, चारचाकी वाहन, ट्रक, बस, कार ही साधने बरीच सुरक्षित मानली जातात व आसरा घेण्यास काहीच हरकत नाही. वादळादरम्यान जनावरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या कोसळण्याने एकाचवेळी अनेक जनावरांना प्राण गमवावा लागतो. वीज नेहमी सर्वात उंच जागेवर कोसळते. धातूची वस्तू जेवढी मोठी तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. जेवढे झाड उंच तेवढा धोका अधिक असतो, त्यामुळे झाडापासून दूर राहावे.जर तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीवर वीज पडली असेल तर त्याच्यावर त्वरित प्रथमोपचार करा. श्वासोच्छवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल.हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल तर अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत तपासणी व नोंद करा. दृष्टी ठिक आहे किंवा नाही, ऐकू येते किंवा नाही तसेच इतर हालचालींची नोंद घ्या.नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्नआपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विजेपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे विजा पडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०१८ मध्ये वीज पडून एकाही नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मेघगर्जना होत असताना शक्यतो जवळपासच्या इमारतीचा आसरा घेणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे. मेघगर्जना सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस