शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

जिल्ह्यात दीड वर्षात अपघातात १७१ ठार

By admin | Updated: August 6, 2015 02:11 IST

लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या कमी असतानाही गडचिरोली या मागास जिल्ह्यात मागील दीड वर्षात रस्ते अपघातात १७१ जणांचा मृत्यू झाला.

२९५ घटना : ५०८ नागरिक झाले जखमीलोकमत विशेषसुनील चौरसिया  गडचिरोलीलोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या कमी असतानाही गडचिरोली या मागास जिल्ह्यात मागील दीड वर्षात रस्ते अपघातात १७१ जणांचा मृत्यू झाला. तर २९५ अपघातांमध्ये ५०८ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरूणांचा समावेश अधिक आहे. राज्यात अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये १४ ते २५ वर्षाच्या तरूणांची टक्केवारी ३२ टक्क्यावरून अधिक आहे.गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाखांच्या जवळ आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे एक लाख वाहने आहे. २०१४ या वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यात १९४ अपघात झाले. यामध्ये ११३ लोकांचा मृत्यू झाला. यात १०४ पुरूष व ९ महिलांचा समावेश आहे. या घटनांमध्ये ३३१ लोक जखमी झाले आहेत. तर २३७ पुरूष व ९४ महिला आहेत. २०१५ या वर्षात जानेवारीपासून जून महिन्यापर्यंत १०१ अपघात झालेत. यात ५८ लोकांचा मृत्यू झाला. यात ५३ पुरूष व पाच महिलांचा समावेश आहे. १७७ लोक अपघातात जखमी झाले आहेत. त्यात ११३ पुरूष व ६४ महिला सहभागी आहेत. मागील दीड वर्षाच्या काळात २९५ रस्ते अपघातात ३६८ पुरूष जखमी झालेत व १५७ जणांचा मृत्यू झाला. यात दुचाकी वाहनावरून झालेल्या अपघाताची संख्या अधिक आहे. २०१० ते २०१२ मध्ये २९० अपघातात ३३७ लोकांचा बळी२०१० मध्ये ९५ अपघातात १०६ जण मरण पावले. २०११ मध्ये ९७ अपघातात १०७ जण तर २०१२ मध्ये ९८ अपघातात १२४ जण मरण पावले आहेत. महाराष्ट्रात महिन्याला साधारणपणे १ हजाराहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते अपघाताच्या संख्येत महाराष्ट्र देशात तामिलनाडू खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षाकाठी १३ हजार जण मरण पावतात.गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते अपघाताची प्रमुख कारणेअहेरी-चंद्रपूर मार्गावर दिना नदीचा पूल तसेच आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावर दरवर्षी वाहने पडून अपघात होतात. वैनगंगा नदीच्या पुलावर आजवर अपघातात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अरूंद व ठेंगणे पूल यामुळे अपघात होतात. हे एक प्रमुख कारण आहे. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात पुलाचे कठडे काढल्यावर अनेक चारचाकी वाहने पुलात कोसळल्याच्या घटना मागील चार ते पाच वर्षात सातत्याने घडत आहे. आलापल्ली येथे एटापल्ली, सिरोंचा, भामरागडकडे जाणाऱ्या चौफुली मार्गावर अपघात होतात. येथे अनेकदा दुचाकीस्वारांना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. हे स्थळ अपघातप्रवण स्थळ आहे. या ठिकाणी भरधाव येणारी वाहने दुचाकीस्वारांसाठी काळ ठरतात. १८ वर्षांपेक्षा कमी वाहनचालकांचा भरणा आता शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यांच्याकडे परवाना नसतानाही ते वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हाच प्रकार अप्रशिक्षित वाहनचालक ट्रॅक्टर चालवितात व शेतात काम करताना ट्रॅक्टर उलटून होणारे मृत्यू हे ही एक प्रमुख कारण आहे.मद्य प्राशन करून वाहने चालविणे हे ही जिल्ह्यात अपघातामागचे प्रमुख कारण आहे. अरूंद व छोटे रस्ते तसेच नादुरूस्त पूल आदींमुळे अनेक अपघात वर्षभरात होतात.