शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST

काेराेनाचे संकट लक्षात घेता मागील शैक्षणिक सत्रात अनेक दिवस शाळा बंद हाेत्या. दहावीचे वर्ग जवळपास दाेनच महिने भरले. त्यानंतर ...

काेराेनाचे संकट लक्षात घेता मागील शैक्षणिक सत्रात अनेक दिवस शाळा बंद हाेत्या. दहावीचे वर्ग जवळपास दाेनच महिने भरले. त्यानंतर पुन्हा तिसरी लाट सुरू झाली. तिसरी लाट ओसरल्यानंतर मे महिन्यात दहावीची परीक्षा घेण्याचा विचार शासन करीत हाेते. मात्र तिसरी लाट अजूनही कायम आहे. दहावीची परीक्षा आता घेणे अशक्य असल्याचे शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने नववी व दहावीच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल घाेषित करण्याचे सूत्र ठरविण्यात आले आहे. या सूत्रानुसार सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण हाेण्याची शक्यता आहे.

दहावीची परीक्षा कधीही जाहीर हाेऊ शकते, असा अंदाज बांधून विद्यार्थी आजपर्यंत अभ्यास करीत हाेते. मात्र शासनाने २८ मे राेजी निकालाचे सूत्र जाहीर करताच विद्यार्थी आता बिनधास्त झाले आहेत. दहावीची परीक्षा दरवर्षी बाेर्डामार्फत जाहीर घेतली जात हाेती. त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात राज्यातील एकाही जिल्ह्याचा एकदाही दहावीचा निकाल १०० टक्के लागला नाही. मात्र यावर्षी प्रत्येक जिल्ह्याचा निकाल १०० टक्के लागण्याची शक्यता आहे.

बाॅक्स

असे असेल नवे सूत्र

नववीतील गुणांचे ५० टक्के व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनावरून ५० टक्के गुण वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण व गृहपाठ, ताेंडीपरीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जातील.

बाॅक्स

विद्यार्थी खूश

दहावीच्या निकालाचे सूत्र जाहीर हाेईपर्यंत विद्यार्थी अधूनमधून अभ्यास करीत हाेते. मात्र शासनाने परीक्षा न घेताच निकाल जाहीर करण्याचे सूत्र २८ मे राेजी जाहीर केेले. निकालाचे सूत्र लक्षात घेतले तर प्रत्येक विद्यार्थी उत्तीर्ण हाेणार असल्याने विद्यार्थी खूश आहेत. आता ते केवळ निकाल घाेषित हाेण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

बाॅक्स

अकरावीत मिळेल सहज प्रवेश

-गडचिराेली जिल्ह्यात अकराव्या वर्गाचे पुरेसे वर्ग आहेत. मागील वर्षीही जवळपास ९० टक्के निकाल लागला हाेता. तरीही अकरावीच्या प्रवेशाची काेणतीही समस्या जाणवली नाही. त्यामुळे यावर्षीही प्रवेशासाठी अडचण जाणवणार नाही.

अशी शक्यता आहे.

- दिवसेेंदिवस विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडे वाढत चालला आहे. त्यामुळे कला शाखेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. याचा ताळमेळ साधावा लागणार आहे.

पालक काय म्हणतात?

काेराेनाचे संकट लक्षात घेता आता परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे निकालाचे सूत्र ठरवून निकाल घाेषित केला जाणार आहे. ही चांगली बाब आहे. शिक्षकांनी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण टाकताना विद्यार्थ्यांवर अन्याय हाेणार नाही. याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

- याेगाजी बाेबाटे, पालक

इतर जिल्ह्यांतील शिक्षक अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अधिक टाकतात. आपल्या जिल्ह्यातीलही शिक्षकांनी हे गुण व्यवस्थित टाकण्याची गरज आहे.

-शिवराम मडावी, पालक

जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी - १७,५६०

मुले-९२८३

मुली-८२७७