शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या आवडत्या काजू कतली मिठाईचा आविष्कार कसा झाला, खातात सगळेच पण माहीत नसेल कुणाला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:44 IST

Kaju Katli History : आपण जी काजू कतली मिठाई खाता तिचा आविष्कार कसा झाला माहिती आहे का? कदाचित बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहीत नसेल. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. 

Kaju Katli History : सणासुदीचे दिवस आले की, चांदीच्या वर्खाने सजलेली काजू कतली घराघरांमध्ये आणली जाते आणि आवडीने खाल्ली सुद्धा जाते. दिवाळी, दसरा, गुढी पाडवा कोणताही सण असो काजू कतली ही मिठाई खायला मिळतेच मिळते. वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जेव्हा गिफ्ट दिलं जातं तर त्यातही काजू कतली असते. हेच काय कुणाच्या घरी काही आनंदी बाब घडली तरी काजू कतली वाटून तोंड गोड केलं जातं. आपल्याही नक्कीच काजू कतली आवडत असेल. आवडत असेल काय...लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना काजू कतली आवडते. पण आपण जी काजू कतली मिठाई खाता तिचा आविष्कार कसा झाला माहिती आहे का? कदाचित बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहीत नसेल. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. 

आपल्याला विश्वास बसणार नाही की, आज स्टेटस सिम्बॉल बनलेल्या मिठाईचा आविष्कार एखाद्या आलिशान महालात किंवा प्रसिद्ध हलवाईच्या दुकानात झाली नव्हती. काजू कतलीच्या उगमाबाबत अनेक कथा सांगितल्या जातात, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा मुघल काळाशी आणि ग्वालियर किल्ल्याशी जोडलेली आहे. जी फारच रोचक आहे. 

मुघल काळातील कथा

काजू कतलीचा इतिहास साधारण 400 वर्षांपूर्वीचा मानला जातो, जो जहांगीर यांच्या कारकिर्दीशी आणि ग्वालिअर किल्ल्याशी संबंधित आहे. 1617 ते 1619 दरम्यान, गुरू हरगोविंद साबेह आणि 52 हिंदू राजे या किल्ल्यात नजरकैदेत होते. त्या काळात गुरु हरगोविंद साहेबांनी कैद्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठे योगदान दिले.

सुटकेनंतरचा गोड सन्मान

गुरुंच्या या सेवाभावाने खूश होऊन जहांगीर यांनी त्यांची आणि इतर राजांची सुटका करण्याचा आदेश दिला. या ऐतिहासिक प्रसंगाच्या आनंदासाठी शाही स्वयंपाक्याने काजू वाटून एक खास गोड पदार्थ तयार केला, जो पुढे “काजू कतली” म्हणून प्रसिद्ध झाला.

पोर्तुगाल काजू, भारतीय चव

आपल्यापैकी अनेकांना हे माहीत नसेल की, काजू भारतात मूळचे नव्हते. ते ब्राझीलमधून पोर्तुगाल लोकांनी 16व्या शतकात गोव्यात आणले. सुरुवातीला या काजूच्या झाडांचा वापर माती टिकून रहावी, ती वाहून जाऊ नये यासाठी केला जात होता. पण नंतर भारतीय स्वयंपाक्यांनी त्याचा वापर मिठाईत सुरू केला, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सुरू केला.  

काजू कतली ही फक्त मिठाई नाही, तर इतिहास, संस्कृती आणि विविध परंपरांचा संगम आहे. पोर्तुगालचा काजू, मुघलांचा शाही टच आणि भारतीय स्वयंपाक कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kaju Katli: The sweet history you probably didn't know.

Web Summary : Kaju Katli's origins trace back 400 years to Mughal India. It was created after Jahangir freed imprisoned kings. The cashew itself came from Brazil via Portugal. It blends history, culture and culinary art.
टॅग्स :foodअन्नInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स