शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चव वेगळी अन् रूपही! दोन्ही हापूसच, पण तरीही देवगड आणि रत्नागिरीच्या आंब्यांमध्ये आहे फरक; केवळ बघूनही लक्षात येईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:08 IST

Devgad Hapoos vs Ratnagiri Hapoos : अनेकांना देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूसमध्ये नेमका काय फरक असतो हे माहीत नसतं. या दोन्हीतील फरक आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने दोन्ही आंबे खाण्याचा आनंद लुटता येईल.

Devgad Hapoos vs Ratnagiri Hapoos : उन्हाळ्याकडे लोक सुट्ट्यांसाठी तर नजर लावून बसलेले असतातच, सोबतच आणखी एका खास गोष्टीसाठी ते उन्हाळ्याची वाट बघतात. ती म्हणजे मनाला आणि जिभेला मोहिनी घालणाऱ्या आंब्यांसाठी. फळांचा राजा म्हटलं जाणारं आंबा हे एक असं फळ आहे जे कुणाला आवडत नाही किंवा त्यांची चव कुणी चाखली नसेल, असं कुणी सापडणार नाही. आंब्याचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. या दिवसांमध्ये लोक आंबे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. आंबा म्हटला की, हापूस आंब्याचा उल्लेख होणार नाही असं होणार नाही. देवगड आणि रत्नागिरीतील हापूस आंब्यांना अधिक मागणी असते. भरपूर लोक दोन्ही प्रजातीच्या आंब्यांचा आनंद घेतात. पण अनेकांना देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूसमध्ये नेमका काय फरक असतो हे माहीत नसतं. या दोन्हीतील फरक आज आपण पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने दोन्ही आंबे खाण्याचा आनंद लुटता येईल.

देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे दोन्ही कोकण किनारपट्टीवरील सर्वोत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचे आंबे आहेत. काही आंबे कमालीचे गोड असतात, तर काही आंब्यांची चव ही आंबट-गोड असते. फरक काही का असेना पण ते खाण्याची मजा काही औरच असते. आंब्याची चव घेताच, मन एका वेगळ्याच विश्वास हरवतं. पण प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते, त्यामुळे या दोन्हीतील फरक माहीत असणं गरजेचं ठरतं. 

देवगड आणि रत्नागिरी हापूसमधील फरक

चव आणि सुगंध: देवगड हापूसचा सुगंध अतिशय तीव्र आणि मनमोहक असतो. चवीला तो जास्त गोड असतो. रत्नागिरी हापूसमध्ये गोडव्यासोबत किंचित आंबटपणाची चव असते आणि तो अधिक रसाळ असतो. रत्नागिरी हापूसचा सुगंध सौम्य असतो.

रंग आणि पोत: देवगड हापूस आंबा पिकल्यावर केशरी-सोनेरी रंगाचा होतो, तर रत्नागिरी आंबा पिवळ्या-केशरी रंगाचा होतो. देवगडचा गर अतिशय मऊ, बटरसारखा आणि फायबरविरहित असतो. तर रत्नागिरीचा गर थोडा फायबरयुक्त पण तरीही स्मूथ असतो.

सालीचा जाडपणा: दोन्ही आंब्यांची साल पातळ असते, परंतू देवगड हापूसची साल तुलनेने थोडी अधिक जाड आणि चिवट असते, ज्यामुळे तो जास्त काळ टिकतो.   

देवगड हापूसचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा तीव्र आणि मोहक सुगंध, जो संपूर्ण खोलीत पसरून फळांचा आणि फुलांचा सुगंध देतो. याशिवाय, या आंब्याची शेल्फ लाइफ तुलनेने जास्त असते, ज्यामुळे आपल्याला त्याची चव अधिक काळ आनंदाने उपभोगता येते.   

रत्नागिरीचे आंबे त्यांच्या वेगळ्या आकारासाठी आणि तितक्याच आकर्षक चवीसाठी ओळखले जातात. देवगड हापूसच्या तुलनेत त्यांचा गर थोडा अधिक फायबरयुक्त असू शकतो, पण त्याची भर ते त्यांच्या समृद्ध, आंबट-गोड चवीने काढतात, ज्याची छान आणि टिकणारी आफ्टरटेस्ट जाणवते.

म्हणजेच काय तर, जर तुम्हाला फायबरविरहित आणि अतिशय गोड आंबा आवडत असेल, तर देवगड हापूस उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला रसाळ, गोड-आंबट आणि मऊ आंबा आवडत असेल, तर रत्नागिरी हापूस उत्तम ठरू शकतो. दोन्हींमध्ये काही फरक असले तरी दोन्हींच्या चवींमध्ये आपापला एक वेगळाच आनंद आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Devgad vs Ratnagiri Hapus Mango: Know the Difference, Enjoy the Taste!

Web Summary : Devgad and Ratnagiri Hapus mangoes are both delicious, but differ in taste, texture and aroma. Devgad is sweeter and more fragrant, while Ratnagiri offers a tangy sweetness. Choose based on your preference for a fiber-free, intensely sweet mango or a juicy, sweet-tangy experience.
टॅग्स :Mangoआंबाfoodअन्नfruitsफळे