शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विटांसाठी फ्लाय ॲश वापराचे बंधन रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:06 PM

Fly ash for bricks औष्णिक वीज केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या वीटभट्ट्यांना बंदी घालण्याचा मुद्दा वगळण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  कोळसा व लिग्नाइटवर चालणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या विटांची निर्मिती बंद करावी, या आशयाची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील प्लाय ॲश वापरण्याच्या बंधनाचा मुद्दा वगळण्यात येत आहे, असे प्रतिज्ञापत्र पंजाब-हरियाणा राज्याच्या चंडिगड उच्च न्यायालयात मंत्रालयाच्या वतीने २० जानेवारी रोजी सादर करण्यात आले. त्यामुळे देशभरातील वीटभट्टी मालकांचा जीव भांड्यात पडला आहे. केंद्र शासनाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार सप्टेंबर, १९९९ मध्ये लाल विटांच्या निर्मितीसाठी भूपृष्ठावरील मातीचे उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये कोळसा किंवा लिग्नाइटवर आधारीत औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणारी फ्लाय अ‍ॅश वापरण्याचे बंधनकारक होते. त्या अधिसूचनेमध्ये संशोधन आणि अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन, जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २५ फेब्रुवारी, २०१९ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर ६० दिवसांत संबंधितांकडून आक्षेपही मागविण्यात आले. आक्षेपानंतर पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले. मात्र, त्या अधिसूचनेनुसार औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या विटांची निर्मिती अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे देशभरासह अमरावती विभागात पारस, नागपूर विभागात कोराडी, मौदा, चंद्रपूर येथे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरातील वीटभट्टी मालकांच्या अडचणी वाढल्या होत्या, तसेच हजारो उद्योग बंद पडणार असल्याने, देशभरातून हजारो आक्षेप केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात दाखल झाले, तसेच पर्यावरण मंत्रालयात ऑल इंडिया ब्रीक्स अ‍ॅण्ड टाइल मॅन्युफ्रॅक्चरर फेडरेशनकडून विशेष पुराव्यांसह बाजूही मांडण्यात आली. त्यासाठी फेडरेशनचे पुणे येथील सदस्य आनंद दामले यांनीही पाठपुरावा केला. 

पर्यावरण मंत्रालयाने मागे घेतली अधिसूचना   केंद्रीय वने, पर्यावरण, जलवायू मंत्रालयातील संशोधक पदावर असलेले डॉ.क्रीश्नन किशोर गर्ग यांनी शासनाच्या अधिसूचनेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र २० जानेवारी रोजी न्यायालयात सादर केले.   त्यामध्ये औष्णिक वीज केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या वीटभट्ट्यांना बंदी घालण्याचा मुद्दा वगळण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा