शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

नॅपकीनची योग्य विल्हेवाट करण्याकडे महिला व प्रशासनाची दुर्लक्षितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 16:53 IST

सॅनिटरी नॅपकीनची योग्य विल्हेवाट होत नसल्याने पर्यावरणाचा होतोय खेळखंडोबा

ठळक मुद्देजागरूकतेचा अभाव, महिलांचे आरोग्य, पर्यावरणावर विपरीत परिणामविल्हेवाट लावण्यासाठी सुविधाच नाही‘प्रॉडक्ट चेंज’ हा प्रभावी उपाय

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : सॅनिटरी नॅपकीन वापरण्याबाबत महिलांमध्ये जागरूकता आली आहे. ही  एक प्रकारे समाधानकारक बाब असली तरी त्या नॅपकीनची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत महिला दाखवीत असलेली उदासीनता आणि त्याला प्रत्येक शहराच्याच प्रशासनाची मिळालेली साथ पर्यावरणाचा खेळखंडोबा करीत आहे.

प्रशासनाकडे नॅपकीनची विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत उपलब्ध नाही, हे वास्तव असले तरी महिलांमध्येही याबाबत अजिबातच जागरूकता नसल्याचे दिसून येते. वास्तविक कचरा जमा करण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे महिलांनी सॅनिटरी नॅपकीन वेगळे करून देणे अपेक्षित आहे. मात्र, मासिक पाळी, त्यासाठी वापरण्यात येणारी साधने याबाबत बोलणे निषिद्ध असल्याप्रमाणे या विषयावर मौन राखले जाते आणि इतर कचऱ्यासोबतच हे नॅपकीन एकत्र करून कचरा संकलित करणाऱ्यांकडे दिले जातात. 

९९ टक्के महिला अशाच प्रकारे गुपचूप; परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीने नॅपकीनची विल्हेवाट लावतात. अनेक महिला एखाद्या जवळच्या कचराकुंडीत हा कचरा फेकतात. महिलांचे असे वर्तन आणि प्रशासनाकडे नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी उपलब्धच नसणारी सुविधा यामुळे ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या समस्येमुळे नजीकच्या काळात हवा, पाणी, जमीन यांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाची स्थिती दयनीय होईल, अशी भीतीही पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

दर महिन्याला भारतातून ९ ते ११ हजार टन कचरा सॅनिटरी नॅपकीनपासून निर्माण होतो. औरंगाबादमध्ये दररोज साधारणपणे दोन ते अडीच लाख वापरलेले नॅपकीन कचऱ्यात फेकले जातात. साधारणपणे एक सॅनिटरी नॅपकीन म्हणजे चार प्लास्टिकच्या पिशव्या असे प्रमाण मानले जाते. त्यामुळे या नॅपकीनच्या विघटनाला शेकडो वर्षे लागतात. तसेच यातून निर्माण होणारे बॅक्टेरिया हवा, पाणी, जमीन यामध्ये मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. 

याविषयी सांगताना पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात की, सॅनिटरी नॅपकीन आणि डायपर्स हा अशा प्रकारचा कचरा आहे, जो बायोमेडिकल वेस्ट किंवा म्युनिसिपल वेस्ट या दोन्ही प्रकारात मोडत नाही. तसेच यावर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची पद्धत अत्यंत महागडी असून, त्यासाठी कोट्यवधींची तरतूद करावी लागते. त्यामुळे भारताची काही बोटांवर मोजण्याइतकी शहरे वगळली तर अन्य कोणत्याही शहरामध्ये याबाबतची ठोस तरतूद केलेली दिसत नाही. सर्वसाधारण कचऱ्यासोबतच नॅपकीन आणि डायपर्स संकलित केली जातात आणि त्याची विल्हेवाट लावली जाते.

महिलांचे आरोग्य, पर्यावरण यासोबतच कचरा संकलित करणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावरही नॅपकीनमधून निघणारे दूषित घटक परिणाम करतात. यातून विविध प्रकारचे संसर्ग आणि आजार निर्माण होऊ शकतात, असेही तज्ज्ञ सांगतात. घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमावलीनुसार नॅपकीनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी प्रत्येक नॅपकीनसोबत स्वतंत्र छोटी पिशवी देणे गरजेचे आहे; पण अपवादात्मक कंपन्या वगळता इतरांनी मात्र हे नियम धाब्यावर बसवले आहेत.

विल्हेवाट लावण्यासाठी सुविधाच नाहीशहरी भागात आजही ९९ टक्के महिला गुपचूप; परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीने नॅपकीनची विल्हेवाट लावतात. अनेक महिला कचराकुंडीत हा कचरा फेकतात. महिलांचे असे वर्तन आणि प्रशासनाकडे नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी सुविधाच नाही. यामुळे नजीकच्या काळात हवा, पाणी, जमीन यांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाची स्थिती दयनीय होईल, अशी भीतीही पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

व्हेंडिंग मशीनचा वापर अत्यंत कमी प्रमाणातकाही महाविद्यालयांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहेत; पण खूप मर्यादित महिलांकडूनच त्याचा उपयोग केला जात असल्यामुळे तो उपाय फार प्रभावी ठरत नाही आणि अति मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी हा उपाय पुरेसाही नाही. यासाठी ‘इन्सिनरेटर’ यंत्रणा बसविली जाते; पण या यंत्रणेतूनही नॅपकीनवर प्रक्रिया झाल्यानंतर पर्यावरणाला हानिकारक ठरणारे दूषित वायू बाहेर पडतात. ही यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. औरंगाबाद शहराने प्रयत्नही सुरू केले नाहीत. 

‘प्रॉडक्ट चेंज’ हा प्रभावी उपायसॅनिटरी नॅपकीनऐवजी दुसरे उत्पादन वापरणे, हा या समस्येवरील सर्वात प्रभावी इलाज आहे. पर्यावरणासोबतच या नॅपकीनमध्ये वापरलेली रसायने महिलांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम करतात. या कारणांमुळे तर काही देशांमध्ये या नॅपकीनच्या वापरावर बंदी आलेली आहे. त्यामुळे आपल्याकडेही महिलांनी आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने विचार करून लवकरच दुसरे उत्पादन वापरायला सुरुवात करणे गरजेचे आहे.- मनीषा चौधरी, अध्यक्षा, दीपशिखा फाऊंडेशन

कचऱ्यासोबतच विल्हेवाट शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी अंदाजे ५ ते १० टक्के कचरा सॅनिटरी नॅपकीनचा आहे. या नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी खूपच मोजके पर्याय उपलब्ध आहेत आणि ते अत्यंत महागडे आहेत. औरंगाबाद शहराची परिस्थितीही राज्यातील इतर शहरांसारखीच असून, येथेही यासाठीचे योग्य तंत्रज्ञान उपलब्ध नाही. इतर कचऱ्यासोबतच याचीही विल्हेवाट लावली जाते.- गौरी मिराशी, घनकचरा व्यवस्थापन अभ्यासक

टॅग्स :Womenमहिलाpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद